Surya Grahan 2025 : कधी आहे २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण ? भारतातून दिसणार का सूर्यग्रहण ? काय आहेत सूतकाचे नियम

मुंबई : वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रानुसार तसेच धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व खूप आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहणाच्या दरम्यान राहू-केतूचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.



या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांनी हे सूर्यग्रहण पाळू नये.


या वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर, बार्बाडोस, बेल्जियम, उत्तर ब्राझील, बर्म्युडा, फिनलंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीनलँड, हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, मोरोक्को, युक्रेन, उत्तर अमेरिकेचे पूर्वेकडील प्रदेश, इंग्लंड इत्यादी ठिकाणी दिसेल.

Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी