Surya Grahan 2025 : कधी आहे २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण ? भारतातून दिसणार का सूर्यग्रहण ? काय आहेत सूतकाचे नियम

मुंबई : वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रानुसार तसेच धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व खूप आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहणाच्या दरम्यान राहू-केतूचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.



या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांनी हे सूर्यग्रहण पाळू नये.


या वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर, बार्बाडोस, बेल्जियम, उत्तर ब्राझील, बर्म्युडा, फिनलंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीनलँड, हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, मोरोक्को, युक्रेन, उत्तर अमेरिकेचे पूर्वेकडील प्रदेश, इंग्लंड इत्यादी ठिकाणी दिसेल.

Comments
Add Comment

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या