Surya Grahan 2025 : कधी आहे २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण ? भारतातून दिसणार का सूर्यग्रहण ? काय आहेत सूतकाचे नियम

मुंबई : वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रानुसार तसेच धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व खूप आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहणाच्या दरम्यान राहू-केतूचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.



या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांनी हे सूर्यग्रहण पाळू नये.


या वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर, बार्बाडोस, बेल्जियम, उत्तर ब्राझील, बर्म्युडा, फिनलंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीनलँड, हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, मोरोक्को, युक्रेन, उत्तर अमेरिकेचे पूर्वेकडील प्रदेश, इंग्लंड इत्यादी ठिकाणी दिसेल.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ