IPL 2025 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'सेकंड बॉल' नियमाचा वापर!

  60

नवीन नियम वापरुनही राजस्थान रॉयल्सचा पराभव


मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे सामना झाला. या आयपीएल २०२५ सामन्यात पहिल्यांदाच एका डावात 'सेकंड बॉल'चा नियम वापरण्यात आला. केकेआरच्या डावाच्या १७ व्या षटकात राजस्थान रॉयल्सने प्रभारी कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली चेंडू बदलण्याची विनंती केली, पण तो सामन्याचा रंग बदलण्यासाठी पुरेसा नव्हता. नवीन नियम वापरुनही, राजस्थान रॉयल्सचा केकेआरकडून आठ विकेट्सनी पराभव झाला. हा त्याचा सलग दुसरा पराभव होता. क्विंटन डी कॉकच्या ६१ चेंडूत ९७ धावांच्या शानदार खेळीमुळे कोलकाताने हंगामातील पहिला विजय नोंदवला.



सांयकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये, जर पंचांना वाटत असेल की दव पडल्याने खेळावर परिणाम होत असेल तर ते दुसऱ्या डावाच्या ११ व्या षटकातून नवीन चेंडू वापरण्याची परवानगी देऊ शकतात. हा नियम फक्त संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांना लागू असेल. दुपारी होणाऱ्या सामन्यांना हा नियम लागू होणार नाही. यामुळे उच्च-स्कोअरिंग सामने राखण्यास मदत होईल. जेणेकरून दोन्ही डावात खेळ संतुलित राहील आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दव पडण्याची मदत मिळणार नाही. अनेकदा संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दवामुळे, नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. यामुळे आता खेळ संतुलित होईल.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट