IPL 2025 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'सेकंड बॉल' नियमाचा वापर!

नवीन नियम वापरुनही राजस्थान रॉयल्सचा पराभव


मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे सामना झाला. या आयपीएल २०२५ सामन्यात पहिल्यांदाच एका डावात 'सेकंड बॉल'चा नियम वापरण्यात आला. केकेआरच्या डावाच्या १७ व्या षटकात राजस्थान रॉयल्सने प्रभारी कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली चेंडू बदलण्याची विनंती केली, पण तो सामन्याचा रंग बदलण्यासाठी पुरेसा नव्हता. नवीन नियम वापरुनही, राजस्थान रॉयल्सचा केकेआरकडून आठ विकेट्सनी पराभव झाला. हा त्याचा सलग दुसरा पराभव होता. क्विंटन डी कॉकच्या ६१ चेंडूत ९७ धावांच्या शानदार खेळीमुळे कोलकाताने हंगामातील पहिला विजय नोंदवला.



सांयकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये, जर पंचांना वाटत असेल की दव पडल्याने खेळावर परिणाम होत असेल तर ते दुसऱ्या डावाच्या ११ व्या षटकातून नवीन चेंडू वापरण्याची परवानगी देऊ शकतात. हा नियम फक्त संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांना लागू असेल. दुपारी होणाऱ्या सामन्यांना हा नियम लागू होणार नाही. यामुळे उच्च-स्कोअरिंग सामने राखण्यास मदत होईल. जेणेकरून दोन्ही डावात खेळ संतुलित राहील आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दव पडण्याची मदत मिळणार नाही. अनेकदा संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दवामुळे, नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. यामुळे आता खेळ संतुलित होईल.

Comments
Add Comment

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार