IPL 2025 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'सेकंड बॉल' नियमाचा वापर!

नवीन नियम वापरुनही राजस्थान रॉयल्सचा पराभव


मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे सामना झाला. या आयपीएल २०२५ सामन्यात पहिल्यांदाच एका डावात 'सेकंड बॉल'चा नियम वापरण्यात आला. केकेआरच्या डावाच्या १७ व्या षटकात राजस्थान रॉयल्सने प्रभारी कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली चेंडू बदलण्याची विनंती केली, पण तो सामन्याचा रंग बदलण्यासाठी पुरेसा नव्हता. नवीन नियम वापरुनही, राजस्थान रॉयल्सचा केकेआरकडून आठ विकेट्सनी पराभव झाला. हा त्याचा सलग दुसरा पराभव होता. क्विंटन डी कॉकच्या ६१ चेंडूत ९७ धावांच्या शानदार खेळीमुळे कोलकाताने हंगामातील पहिला विजय नोंदवला.



सांयकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये, जर पंचांना वाटत असेल की दव पडल्याने खेळावर परिणाम होत असेल तर ते दुसऱ्या डावाच्या ११ व्या षटकातून नवीन चेंडू वापरण्याची परवानगी देऊ शकतात. हा नियम फक्त संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांना लागू असेल. दुपारी होणाऱ्या सामन्यांना हा नियम लागू होणार नाही. यामुळे उच्च-स्कोअरिंग सामने राखण्यास मदत होईल. जेणेकरून दोन्ही डावात खेळ संतुलित राहील आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दव पडण्याची मदत मिळणार नाही. अनेकदा संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दवामुळे, नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. यामुळे आता खेळ संतुलित होईल.

Comments
Add Comment

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक