IPL 2025: लखनऊने हैदराबादला ५ विकेटनी हरवले, मार्श-पूरनचा कहर

  59

मुंबई: ऋषभ पंतच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील विजयाची चव चाखली आहे. लखनऊच्या संघाने आपला दुसरा सामना गुरूवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ५ विकेटनी विजय मिळवला.


हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने १९१ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात लखनऊच्या संघाने ४ विकेट गमावत १६.१ षटकांतच हा सामना जिंकला.


या डावात निकोलस पूरनने १८ आणि मिचेल मार्शने २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरही हिरो राहिला. त्याने ४ विकेट मिळवल्या. लखनऊसाठी पूरनने २६ बॉलमध्ये ७० धावांची तडाखेबंद खेळी केली. या दरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले.


तर मिचेल मार्शने ३१ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या. या दरम्यान २ षटकार आणि ७ चौकार ठोकले. अखेरीस कर्णधार ऋषभ पंतने १५ आणि अब्दुल समदने नाबाद २२ धावा केल्या. हैदराबाद संघासाठी कर्णधार पॅट कमिन्सने २ विकेट मिळवल्या. तर मोहम्मद शमी, एडम झाम्पा आणि हर्षल पटेलला प्रत्येकी १ विकेट मिळवता आला.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी