Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘सुप्रिम’ची नाराजी

असंवेदनशील व अमानवी, बलात्कारासंबंधी निकाल


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका वादग्रस्त निकालावर स्थगिती दिली आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने १७ मार्च रोजी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने संज्ञान घेत सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती दिली आहे.


एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल वादग्रस्त ठरला होता. पीडितेच्या स्तनांना स्पर्श करणे, तिच्या पायजम्याची नाडी सोडणे आणि पीडितेला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा नाहीत, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी म्हटले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा निकाल पूर्णपणे असंवेदनशील व अमानवी दृष्टीकोन दर्शवतो’.



सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की आम्हाला याप्रकरणी निकाल देताना आणि उच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचं सांगताना खेद वाटतो की त्यांच्या काही टिप्पण्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर कठोरपणे असहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई म्हणाले, “उच्च न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक होता.”



१४ वर्षे जुने होते प्रकरण


उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे २०११ मध्ये हा गुन्हा घडला होता. दोन आरोपींनी एका ११ वर्षीय मुलीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही आरोपींनी तिच्या छातीला स्पर्श केला, तिच्या पायजम्याची नाडी सोडली, तसेच तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पादचाऱ्यांनी या दोघांना हटकल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला होता.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी