Shreyas Iyer: शतकाचे टेन्शन घेऊ नको...अय्यर का राहिला ९७वर नॉट आऊट?

मुंबई: गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२५मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सच्या १७ ते २० षटकांदरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ चार चेंडूंचा सामना केला. या चार बॉलमध्ये ७ धावा केल्या. तो ९७ धावा करून नाबाद परतला. खास बाब म्हणजे या डेथ ओव्हर्समध्ये एकदाही त्याला शतक पूर्ण करावे असे वाटले नाही.


श्रेयससोबक नॉन स्ट्रायकरच्या बाजूला असलेल्या शशांक सिंहने शेवटच्या तीन षटकात स्ट्राईक सांभाळली आणि पंजाबसाठी चौकार तसेच षटकारांचा पाऊस केला. शशांकने सांगितले श्रेयसचा मेसेज पूर्ण स्पष्ट होता की, माझ्या शतकाबद्दल विचार करू नकोस. फक्त जितके चौकार मारता येतील तितके मार.



शशांकने तसेच केले. पंजाब किंग्सच्या १६व्या षटकांत फलंदाजी करणाऱ्या आलेल्या शशांकची ओळख गेल्या आयपीएलमध्ये फिनिशर अशी होती. त्याने गुजरातविरुद्ध १६ बॉलमध्ये नाबाद ४४ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यामुळे पंजाबला २० षटकांत ५ बाद २४३ धावा करता आल्या.


शशांकने याबद्दल बोलताना सांगितले की, मी इमानदारीने सांगेन की श्रेयसने मला पहिल्या बॉलपासून सांगितले होते की माझ्या शतकाची चिंता करू नकोस. मी फक्त बॉलकडे बघत होतो आणि त्यावर रिअॅक्ट होत होतो.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून