Shreyas Iyer: शतकाचे टेन्शन घेऊ नको...अय्यर का राहिला ९७वर नॉट आऊट?

मुंबई: गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२५मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सच्या १७ ते २० षटकांदरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ चार चेंडूंचा सामना केला. या चार बॉलमध्ये ७ धावा केल्या. तो ९७ धावा करून नाबाद परतला. खास बाब म्हणजे या डेथ ओव्हर्समध्ये एकदाही त्याला शतक पूर्ण करावे असे वाटले नाही.


श्रेयससोबक नॉन स्ट्रायकरच्या बाजूला असलेल्या शशांक सिंहने शेवटच्या तीन षटकात स्ट्राईक सांभाळली आणि पंजाबसाठी चौकार तसेच षटकारांचा पाऊस केला. शशांकने सांगितले श्रेयसचा मेसेज पूर्ण स्पष्ट होता की, माझ्या शतकाबद्दल विचार करू नकोस. फक्त जितके चौकार मारता येतील तितके मार.



शशांकने तसेच केले. पंजाब किंग्सच्या १६व्या षटकांत फलंदाजी करणाऱ्या आलेल्या शशांकची ओळख गेल्या आयपीएलमध्ये फिनिशर अशी होती. त्याने गुजरातविरुद्ध १६ बॉलमध्ये नाबाद ४४ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यामुळे पंजाबला २० षटकांत ५ बाद २४३ धावा करता आल्या.


शशांकने याबद्दल बोलताना सांगितले की, मी इमानदारीने सांगेन की श्रेयसने मला पहिल्या बॉलपासून सांगितले होते की माझ्या शतकाची चिंता करू नकोस. मी फक्त बॉलकडे बघत होतो आणि त्यावर रिअॅक्ट होत होतो.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख