Swarnima Scheme For Women : महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! मोदी सरकारची स्वर्णिमा योजना, २ लाखांचं कर्ज फक्त ५ टक्के व्याजदराने

नवी दिल्ली : महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. स्वर्णिमा योजना (Swarnima Scheme) अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक करण्याची गरज नाही. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे.


ही योजना मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांना पूरक ठरेल. महिला उद्योजकांसाठी ही मोठी संधी असून त्यांना आर्थिक मदतीसह व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.



महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेत अर्ज कसा करावा, काय आहेत नियम अटी, जाणून घेऊया सविस्तर माहिती...



योजनेची वैशिष्ट्ये


मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी विशेष योजना.


₹२ लाखांपर्यंतचे कर्ज फक्त ५% वार्षिक व्याजदराने.


स्वयंरोजगारासाठी कर्जाचा वापर करता येणार.


भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता नाही.


योजनेचे फायदे


कमी व्याजदरावर आर्थिक मदत उपलब्ध.


महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी.


महिलांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची संधी.


कोण अर्ज करू शकते?


अर्जदार महिला असावी.


वय १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे.


वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा कमी असावे.


महिला उद्योजक असावी किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी.



अर्ज कसा करावा?


स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज ऑफलाइन स्वरूपात स्वीकारले जातील.


१. जवळच्या राज्य वाहिनीकृत एजन्सी (SCA) कार्यालयात भेट द्या.


२. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.


३. छाननीनंतर पात्र महिलांना कर्ज मंजूर केले जाईल.


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे



  • आधार कार्ड

  • शिधापत्रिका

  • रहिवासी प्रमाणपत्र

  • जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)

  • पासपोर्ट साईज फोटो


महिलांसाठी आर्थिक स्वायत्ततेकडे एक पाऊल!


ही योजना आर्थिक दृष्टिकोनातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रभावी ठरेल. महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व