नवी दिल्ली : महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. स्वर्णिमा योजना (Swarnima Scheme) अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक करण्याची गरज नाही. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे.
ही योजना मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांना पूरक ठरेल. महिला उद्योजकांसाठी ही मोठी संधी असून त्यांना आर्थिक मदतीसह व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेत अर्ज कसा करावा, काय आहेत नियम अटी, जाणून घेऊया सविस्तर माहिती…
कमी व्याजदरावर आर्थिक मदत उपलब्ध.
महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी.
महिलांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची संधी.
कोण अर्ज करू शकते?
अर्जदार महिला असावी.
वय १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा कमी असावे.
महिला उद्योजक असावी किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी.
ही योजना आर्थिक दृष्टिकोनातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रभावी ठरेल. महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…