Swarnima Scheme For Women : महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! मोदी सरकारची स्वर्णिमा योजना, २ लाखांचं कर्ज फक्त ५ टक्के व्याजदराने

नवी दिल्ली : महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. स्वर्णिमा योजना (Swarnima Scheme) अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक करण्याची गरज नाही. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे.


ही योजना मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांना पूरक ठरेल. महिला उद्योजकांसाठी ही मोठी संधी असून त्यांना आर्थिक मदतीसह व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.



महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेत अर्ज कसा करावा, काय आहेत नियम अटी, जाणून घेऊया सविस्तर माहिती...



योजनेची वैशिष्ट्ये


मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी विशेष योजना.


₹२ लाखांपर्यंतचे कर्ज फक्त ५% वार्षिक व्याजदराने.


स्वयंरोजगारासाठी कर्जाचा वापर करता येणार.


भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता नाही.


योजनेचे फायदे


कमी व्याजदरावर आर्थिक मदत उपलब्ध.


महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी.


महिलांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची संधी.


कोण अर्ज करू शकते?


अर्जदार महिला असावी.


वय १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे.


वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा कमी असावे.


महिला उद्योजक असावी किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी.



अर्ज कसा करावा?


स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज ऑफलाइन स्वरूपात स्वीकारले जातील.


१. जवळच्या राज्य वाहिनीकृत एजन्सी (SCA) कार्यालयात भेट द्या.


२. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.


३. छाननीनंतर पात्र महिलांना कर्ज मंजूर केले जाईल.


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे



  • आधार कार्ड

  • शिधापत्रिका

  • रहिवासी प्रमाणपत्र

  • जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)

  • पासपोर्ट साईज फोटो


महिलांसाठी आर्थिक स्वायत्ततेकडे एक पाऊल!


ही योजना आर्थिक दृष्टिकोनातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रभावी ठरेल. महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

Comments
Add Comment

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर

मुस्लीमबहुल भागात एनडीएची सरशी

पटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस-उबाठा सेनेत कलगीतुरा

अंबादास दानवे यांच्या टीकेला भाई जगताप यांचे प्रत्त्युतर मुंबई  : मतमोजणीदरम्यान बिहारमध्ये कोणाचे सरकार

जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम