आतिशी मार्लेना यांना हायकोर्टाची नोटीस

  35

दिल्ली निवडणुकीतील भ्रष्टाचाराचे प्रकरण


नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज, बुधवारी नोटीस बजावली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाने अतिशी यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलैरोजी होणार आहे.


कमलजीत सिंग दुग्गल आणि आयुष राणा यांनी अतिशी यांच्या आमदार म्हणून कालकाजी विधानसभा मतदारसंघातील निवडीला आव्हान दिले आहे. दोन्ही याचिकाकर्ते कालकाजी परिसरातील रहिवासी आहेत. अतिशी आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणुकीदरम्यान भ्रष्ट पद्धतींचा अवलंब केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच याचिकेत अतिशी यांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.


आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांचा 3 हजार 521 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी आतिशी मार्लेना, केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली पोलिस आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनाही या याचिकेवर नोटीस बजावली आहे.

Comments
Add Comment

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :