ATM : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. नव्या नियमानुसार ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १९ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स अर्थात खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची तपासणी करण्यासाठी प्रत्येकवेळी ७ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. आधी होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १७ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासण्यासाठी ६ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. नवे नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत.



शहरात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल पाच वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल तीन वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यापैकी एखादा पर्याय वापरुन बॅलन्स तपासण्यासाठी पैसे आकारले जाणार नाही.



नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने सादर केलेल्या या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील सर्व बँका १ मे २०२५ पासून एटीएम, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यासाठी नवे नियम लागू करतील.

 
Comments
Add Comment

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

मुंबई : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला.

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या