'या' मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार

मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश एक एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले जातील त्या नंबरांचा वापर करुन नंतर कधीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. काढून टाकलेल्या नंबरांचा वापर मोबाईल वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांसाठीही करता येणार नाही. या प्रक्रियेत फक्त जे मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह असतील, तेच काढून टाकण्यात येणार आहेत.



इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर पुढील ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ रिचार्ज न केल्यामुळे बंद झालेले मोबाईल नंबर. हे इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करता येतील की नाही याची अधिकृत माहिती संबंधित मोबाईल नंबरचे सर्व्हिस प्रोव्हायडर अर्थात सेवा प्रदाता देऊ शकतात. यामुळे आपला नंबर इनअॅक्टिव्ह झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित नंबरच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी अथवा संबंधित नंबर ज्या कंपनीचा आहे त्यांच्या गॅलरीशी संपर्क साधणे हिताचे आहे.



हल्ली UPI द्वारे करायचे आर्थिक व्यवहार तसेच मोबाईल वॉलेट, बँकिंग, ऑनलाईन व्यवहार यासाठी मोबाईल नंबर महत्त्वाचा असतो. हा नंबर संबंधित व्यक्तीला ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. याच कारणामुळे एनपीसीआयच्या निर्देशानुसार इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठ हे उपाय करण्याचा निर्णय झाला आहे.
Comments
Add Comment

'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे.

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

Border 2 Box Office Collection Day 8 : सनी देओलचा जलवा कायम; ८ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

मुंबई : सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रजासत्ताक

Sharad Pawar : अजितदादांची 'ती' शेवटची इच्छा पूर्ण करणार; विलीनीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात होता, पण...शरद पवार स्पष्टचं बोलले!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाने एक

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर

Sunetra Pawar Oath : म्हणून सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार