'या' मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार

मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश एक एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले जातील त्या नंबरांचा वापर करुन नंतर कधीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. काढून टाकलेल्या नंबरांचा वापर मोबाईल वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांसाठीही करता येणार नाही. या प्रक्रियेत फक्त जे मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह असतील, तेच काढून टाकण्यात येणार आहेत.



इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर पुढील ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ रिचार्ज न केल्यामुळे बंद झालेले मोबाईल नंबर. हे इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करता येतील की नाही याची अधिकृत माहिती संबंधित मोबाईल नंबरचे सर्व्हिस प्रोव्हायडर अर्थात सेवा प्रदाता देऊ शकतात. यामुळे आपला नंबर इनअॅक्टिव्ह झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित नंबरच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी अथवा संबंधित नंबर ज्या कंपनीचा आहे त्यांच्या गॅलरीशी संपर्क साधणे हिताचे आहे.



हल्ली UPI द्वारे करायचे आर्थिक व्यवहार तसेच मोबाईल वॉलेट, बँकिंग, ऑनलाईन व्यवहार यासाठी मोबाईल नंबर महत्त्वाचा असतो. हा नंबर संबंधित व्यक्तीला ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. याच कारणामुळे एनपीसीआयच्या निर्देशानुसार इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठ हे उपाय करण्याचा निर्णय झाला आहे.
Comments
Add Comment

निवडणूक आयोगाने केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिल्लीत पत्रकार

राहुल गांधी संसदेत केवळ चहा आणि पकोडे खाण्यासाठी जातात - अमित शाह यांची जहरी टीका

आसामच्या दौऱ्यात आज म्हणजेच रविवार १५ मार्च रोजी राज्यातील आरोग्य सेवा प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; चीन, जपान, ब्रिटनकडे अमेरिकेची मदतीची हाक

- होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेचे अनेक देशांना आवाहन अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाचा आज

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

आमच्या मुलीशी का बोलतोस? म्हणून केला खून; पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात तरुणाच्या मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी संपर्क

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला