IPL 2025: ती शेवटची ३ षटके ज्यामुळे दिल्लीने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या चौथ्या सामना अतिशय अटीतटीचा झाला. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या संघाने १ विकेटनी विजय मिळवला. सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने २१० धावांचे आव्हान दिले होते.


दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्मा मॅन ऑफ दी मॅच ठरला. त्याने ३१ बॉलमध्ये नाबाद ६६ धावांची खेळी करत विजय मिळवून दिला. त्याने शेवटच्या षटकातील आपल्या फलंदाजीने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. एकवेळेस दिल्लीच्या संघाने ६५ धावांवर ५ विकेट गमावले होते. यानंतर संघ अडखळताना दिसत होता. १३व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर त्यांनी ६वी विकेट गमावली होती. तेव्हा संघाची धावसंख्या ११३ होती. येथून दिल्ली हरेल असेच वाटत होते.


यानंतर विपराज निगम गेमचेंजर म्हणून उभा राहिला. त्याने ८व्या स्थानावर येत १५ बॉलमध्ये ३९ धावा केल्या. सोबतच आशुतोष सोबत मिळून ७व्या विकेटसाठी २२ बॉलमध्ये ५५ धावांची मॅच विनिंग पार्टनरशिप केली. विपराज बाद झाल्यानंतर आशुतोषने मोर्चा सांभाळला आणि सामना संपवला.



शेवटच्या ३ षटकांत बदलले सामन्याचे चित्र


विपराज बाद झाल्यानंतर दिल्ली पुन्हा हरताना दिसली. त्याना १८ बॉलमध्ये ३९ धावा हव्या होत्या. विकेटवर दिल्लीचा मिचेल स्टार्क आणि आशुतोष होता. १८व्या षटकातील पहिल्याच बॉलवर स्टार्क बाद झाला. त्यानंतर कुलदीप आला त्याने तिसऱ्या बॉलवर एक धाव घेत आशुतोषला स्ट्राईक दिला. यानंतर आशुतोषने तीन बॉलवर १६ धावा केल्या.


शेवटच्या २ षटकांत दिल्लीला २२ धावा हव्या होत्या. प्रिंस यादवच्या १९व्या षटकातील पहिल्याच बॉलवर कुलदीपने चौकार ठोकला आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर तो बाद झाला. चौथ्या बॉलवर आशुतोषने २ धावा केल्या. शेवटच्या २ बॉलमध्ये त्याने षटकार आणि चौकार ठोकला.


२०व्या षटकांत दिल्लीला ६ बॉलमध्ये ६ धावा हव्या होत्या. मोहित शर्माने डक खेळल्यानंतर पुढील बॉलवर एकेरी धाव घेतली. तिसऱ्या बॉलवर आशुतोषने षटकार खेचला. आणि दिल्लीचा संघ विजयी ठरला.

Comments
Add Comment

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान