IPL 2025: ती शेवटची ३ षटके ज्यामुळे दिल्लीने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास

  60

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या चौथ्या सामना अतिशय अटीतटीचा झाला. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या संघाने १ विकेटनी विजय मिळवला. सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने २१० धावांचे आव्हान दिले होते.


दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्मा मॅन ऑफ दी मॅच ठरला. त्याने ३१ बॉलमध्ये नाबाद ६६ धावांची खेळी करत विजय मिळवून दिला. त्याने शेवटच्या षटकातील आपल्या फलंदाजीने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. एकवेळेस दिल्लीच्या संघाने ६५ धावांवर ५ विकेट गमावले होते. यानंतर संघ अडखळताना दिसत होता. १३व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर त्यांनी ६वी विकेट गमावली होती. तेव्हा संघाची धावसंख्या ११३ होती. येथून दिल्ली हरेल असेच वाटत होते.


यानंतर विपराज निगम गेमचेंजर म्हणून उभा राहिला. त्याने ८व्या स्थानावर येत १५ बॉलमध्ये ३९ धावा केल्या. सोबतच आशुतोष सोबत मिळून ७व्या विकेटसाठी २२ बॉलमध्ये ५५ धावांची मॅच विनिंग पार्टनरशिप केली. विपराज बाद झाल्यानंतर आशुतोषने मोर्चा सांभाळला आणि सामना संपवला.



शेवटच्या ३ षटकांत बदलले सामन्याचे चित्र


विपराज बाद झाल्यानंतर दिल्ली पुन्हा हरताना दिसली. त्याना १८ बॉलमध्ये ३९ धावा हव्या होत्या. विकेटवर दिल्लीचा मिचेल स्टार्क आणि आशुतोष होता. १८व्या षटकातील पहिल्याच बॉलवर स्टार्क बाद झाला. त्यानंतर कुलदीप आला त्याने तिसऱ्या बॉलवर एक धाव घेत आशुतोषला स्ट्राईक दिला. यानंतर आशुतोषने तीन बॉलवर १६ धावा केल्या.


शेवटच्या २ षटकांत दिल्लीला २२ धावा हव्या होत्या. प्रिंस यादवच्या १९व्या षटकातील पहिल्याच बॉलवर कुलदीपने चौकार ठोकला आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर तो बाद झाला. चौथ्या बॉलवर आशुतोषने २ धावा केल्या. शेवटच्या २ बॉलमध्ये त्याने षटकार आणि चौकार ठोकला.


२०व्या षटकांत दिल्लीला ६ बॉलमध्ये ६ धावा हव्या होत्या. मोहित शर्माने डक खेळल्यानंतर पुढील बॉलवर एकेरी धाव घेतली. तिसऱ्या बॉलवर आशुतोषने षटकार खेचला. आणि दिल्लीचा संघ विजयी ठरला.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण