'प्रशांत कोरटकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक'

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली. कोरटकरला तेलंगणातून आणून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केले जाईल. याआधी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. ही प्रक्रिया सुरू असतानाच कोरटकरच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे.



तेलंगणात प्रशांत कोरटकर एका काँग्रेस नेत्याच्या घरात लपला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. काँग्रेसने प्रशांत कोरटकरला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण प्रशांत कोरटकरच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले. यामुळे तो नेमका कुठे लपला आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक केली आहे, असेही आमदार परिणय फुके यांनी सांगितले.

आमदार परिणय फुके यांच्या आरोपामुळे राजकारण तापले आहे. या विषयावर बोलताना काँग्रेस आमदारांनी बचावात्मक पवित्रा घेतला. परिणय फुके मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडके आमदार होण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. हा आरोप करताना वडेट्टीवार यांनी फुके यांचे आरोप फेटाळले नाही. कोरटकरला मदत केलेल्यांवर ठोस पुराव्यांच्याआधारे कारवाई करायला पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले. पण पुरावे नसताना कोणीही प्रसिद्धीसाठी आरोप करणे योग्य नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
Comments
Add Comment

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे