Bmc News : शनिवार ते सोमवार सुट्टीतही महापालिकेची नागरी सुविधा केंद्र राहणार खुली

थकीत जलदेयके भरण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन


मुंबई : जलजोडणीधारकांना जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘अभय योजना’ राबविली जात आहे. या अभय योजने अंतर्गत थकीत जलदेयक रकमेचा एकरकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ करण्यात येतो. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. त्यामुळे, जलदेयकांच्या अधिदानाकरीता शनिवारी २९ मार्च २०२५, रविवारी ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटी आणि सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा व सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी जलदेयकांचा भरणा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.




मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचा भरणा जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे. एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना जलदेयकांचा भरणा करता यावा यासाठी शनिवारी २९ मार्च २०२५, रविवारी ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटीच्या दिवशी आणि सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद निमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी, जलजोडणीधारकांनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी थकीत जलदेयकांचे ३१ मार्च २०२५ पूर्वी पैसे भरावे आणि अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला.

लालबागचा राजा नव्हे... देणगीच्या बाबतीत 'हा' गणपती मुंबईत आघाडीवर, ५ दिवसांत मिळाली १५ कोटींची देणगी

मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब