Crime : अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने केला बापाच्या गुप्तांगावर वार

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्याच्या पूर्व भागातील बावशेत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापाचे गुप्तांग कापले. सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. अखेर संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला. तसेच त्याच्या शरीरावर इतरत्र पण वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बापाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



सावत्र बाप वारंवार अश्लिल वर्तन करत होता म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची कबुली मुलीने दिली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा सावत्र बाप गंभीर जखमी झाला आणि आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी मुलीला पोलीस न्याय देतील असे सांगितले. अखेर शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून मुलीने हातातून धारदार सुरा खाली टाकला. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस येताच मुलीने तिच्या कृत्याची कबुली दिली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. जखमी असलेला रमेश हा मुलीचा सावत्र बाप होता. लग्न झाल्यापासून रमेश जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा तेव्हा मुलीला एकटे गाठून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळीही तसाच प्रकार घडला आणि संतापलेल्या मुलीने रमेशवर धारदार सुऱ्याने वार केले. या प्रकरणी मुलगी अटकेत आहे. जखमी असलेल्या मुलीच्या सावत्र बापाविरोधातही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलीस त्याची तब्येत सुधारण्याची वाट बघत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा