Crime : अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने केला बापाच्या गुप्तांगावर वार

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्याच्या पूर्व भागातील बावशेत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापाचे गुप्तांग कापले. सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. अखेर संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला. तसेच त्याच्या शरीरावर इतरत्र पण वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बापाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



सावत्र बाप वारंवार अश्लिल वर्तन करत होता म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची कबुली मुलीने दिली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा सावत्र बाप गंभीर जखमी झाला आणि आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी मुलीला पोलीस न्याय देतील असे सांगितले. अखेर शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून मुलीने हातातून धारदार सुरा खाली टाकला. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस येताच मुलीने तिच्या कृत्याची कबुली दिली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. जखमी असलेला रमेश हा मुलीचा सावत्र बाप होता. लग्न झाल्यापासून रमेश जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा तेव्हा मुलीला एकटे गाठून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळीही तसाच प्रकार घडला आणि संतापलेल्या मुलीने रमेशवर धारदार सुऱ्याने वार केले. या प्रकरणी मुलगी अटकेत आहे. जखमी असलेल्या मुलीच्या सावत्र बापाविरोधातही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलीस त्याची तब्येत सुधारण्याची वाट बघत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक