Ajit Pawar : फुले दांपत्याला 'भारतरत्न' देण्याचा ठराव - अजित पवार

मुंबई : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.


संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहे. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करुन, स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. आज शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत. देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टीला, घेतलेल्या कष्टाला आहेत.



समाजातील दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दांपत्याने केलेलं कार्य अलौकिक आहे. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी ते कायम ‘महात्मा’ राहणार आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

Droupadi Murmu : ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 'राफेल'मध्ये स्वार; लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती!

हरियाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला हवाई दल स्थानकावर राफेल (Rafale) लढाऊ

कर्नाटकात आरएसएसला दिलासा! कॉंग्रेस सरकारच्या 'त्या' आदेशावर खंडपीठाची स्थगिती

कर्नाटक: सरकारी आवारात कोणतेही उपक्रम आयोजित करण्यापूर्वी खासगी संस्थांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक

CNAP Service : फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना आळा! 'CNAP' सेवेमुळे अनोळखी व्यक्तीचे टेन्शन गेले; सरकारचे मोठे पाऊल

नवी दिल्ली : मोबाईलवर येणारे अज्ञात (Unidentified) कॉल ही अनेक वापरकर्त्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. अनोळखी

‘मोंथा’चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’

नवी दिल्ली  : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून या चक्रीवादळाला थायलंडने

आठवा वेतन आयोग मंजूर

पन्नास लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची भेट नवी दिल्ली  : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे.

आंध्र प्रदेशात १०० किमी वेगाने धडकले 'मोंथा' चक्रीवादळ, वादळामुळे एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमी

आता वादळाचा प्रवास ओडिशाच्या दिशेने अमरावती : ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून ओडिशाच्या