Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप राज्य शासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच प्रशांत कोरटकर याला महाराष्ट्रात आणले जाईल. राज्यात आणल्यावर त्याच्या विरुद्धची पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.

काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने आपल्याला शिवीगाळ करुन महापुरुषांचा अवमान केला, अशी तक्रार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली होती. यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले. या रेकॉर्डिंगमध्ये इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलत असलेली व्यक्ती त्यांना शिव्या देत असल्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचे ऐकू येत आहे. हे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवून घेतला. ही कारवाई सुरू असताना आधी मोबाईल हॅक झाला असा दावा करणारा प्रशांत कोरटकर नंतर संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर आता प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये