IPL 2025: रोमहर्षक सामन्यात दिल्लीने मारली बाजी, लखनऊला १ विकेटनी हरवले

  54

विशाखापट्ट्णम: आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपरडजायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना जबरदस्त रंगला. या सामन्यात शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. अखेरीस दिल्लीच्या आशुतोष शर्माने जिंकण्यासाठीचा षटकार खेचला आणि दिल्लीला विजय मिळवून दिला.


आशुतोष शर्माने अखेरपर्यंत नाबाद राहत दिल्लीच्या विजयात मोठी भूमिका निभावली. त्याने नाबाद ६६ धावा केल्या. हा खरंच आश्चर्यजनक सामना होता. ७ धावांत ३ विकेट गमावल्यानंतर चौथ्या स्थानावरील कर्णधार अक्षऱ पटेलने २२ धावा केल्या. खरंतर दिल्लीच्या फलंदाजांना धावांचा पाठलाग करणे तितके सोपे नव्हते. कारण ठराविक अंतराने विकेट पडत होते. मात्र आशुतोष शर्मा शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने दिल्लीचा विजय सुकर केला. दिल्लीने लखनऊविरुद्धचा सामना १ विकेट आणि ३ बॉल राखत जिंकला.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्सने २०९ धावा करत दिल्लीसमोर मोठे आव्हान ठेवले होते.लखनऊकडून निकोल पूरन आणि मिचेल मार्श यांनी तडाखेबंद खेळी केली. दुसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शने ३६ बॉलमध्ये ७२ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. निकोलस पूरनने ३० बॉलमध्ये ७५ धावा तडकावल्या. यात त्याने ६ चौकार आणि ७ षटकार ठोकले.


या दोघांच्या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपरजायंट्सला २०० धावांचा टप्पा पार करता आला. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे