Bullet Train Project : अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पस्थळी अपघात, २५ गाड्या रद्द

अहमदाबाद : अहमदाबादजवळील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी रविवारी (दि. २३) रात्री झालेल्या अपघातामुळे जवळच्या रेल्वे मार्गावर परिणाम झाला, ज्यामुळे अनेक गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे तर अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल) ने सांगितले.





मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास, वटवा (अहमदाबादजवळ) येथे व्हायाडक्ट बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सेगमेंटल लाँचिंग गॅन्ट्रीपैकी एक काँक्रीट गर्डरचे लाँचिंग पूर्ण झाल्यानंतर मागे हटत होती ते चुकून जागेवरून घसरले असे एनएचएसआरसीएलने एका निवेदनात म्हटले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नाही असेही म्हटले आहे.तथापि, या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला, ज्यामुळे किमान २५ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १५ इतर अंशतः रद्द करण्यात आल्या, पाच गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आणि सहा गाड्या वळवण्यात आल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित मार्गावर गाड्यांची वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनएचएसआरसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोड क्रेनच्या मदतीने पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



या अपघातामुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये वटवा-बोरिवली एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, वडोदरा-वटवा इंटरसिटी, अहमदाबाद-वलसाड गुजरात क्वीन, जामनगर-वडोदरा इंटरसिटी, वडनगर-वलसाड-वडनगर एक्सप्रेस आणि वटवा-आनंद मेमू यांचा समावेश आहे. अहमदाबाद-एमजीआर चेन्नई सेंट्रल हमसफर एक्सप्रेस, राजकोट-सिकंदराबाद एक्सप्रेस आणि इतर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांसाठी एक हेल्पलाइन नंबरही जारी केला.

Comments
Add Comment

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र