Traffic Rules : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई

१३ महिन्यांत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारला


मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या १३ महिन्यांत १ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करणाऱ्या ६५,१२,८४६ वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपयांची वसुली वाहतूक पोलिसांनी केली आहे. तर ३६९ कोटी रुपयांची थकबाकी अजूनही राहिलेली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट केली आहे.


मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये ४१ वाहतूक आणि १ मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ २०,९९,३९६ वाहन चालकांनी दंड भरला असून अद्याप ४४,१३,४५० वाहन चालकांनी दंड भरलेला नाही.



फ्लिकर आणि अंबर दिव्यांवर कारवाई


मुंबई वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करत फ्लिकर आणि अंबर दिवे वापरणाऱ्या ४७ वाहन चालकांविरोधात कारवाई करत २३,५०० रुपयांचा दंड आकारला आला. मात्र, यातील केवळ ७ वाहन चालकांनी ३,५०० रुपये दंड भरलेला आहे. यामध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई ही मरीन ड्राईव्ह परिसरात केली आहे. यामध्ये ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.


मुंबई आरटीआई कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. त्यामुळे दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे. दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला

एन. ए.' परवानगी इतिहासजमा

•बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी •जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज •महसूलमंत्र्यांची जमीन

मानसिक आरोग्य आणि सर्वसमावेशक कार्यालयीन भारतीय संस्कृती ही काळाची गरज

मुंबई : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि सर्वसमावेशकता या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ट संबंध येतो. या

रूस्तमजीकडून मुंबईतील ऐतिहासिक वाडिया क्लॉक टॉवरचे नूतनीकरण

मुंबई : रूस्तमजी ग्रुप या मुंबईतील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकाने फोर्ट परिसरातील ऐतिहासिक 'बोमनजी होरमरजी

देशातील पहिला क्लायमेट वीक मुंबईत

मुंबई : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,