Accident News : काश्मीरमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह चौघांचा मृत्यू

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील कंगन येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ रविवारी (दि.२३) बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह एका स्थानिक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २ पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती देताना कंगनचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. अर्शिद बाबा यांनी सांगितले की, 'ही एक दुर्दैवी घटना आहे.



केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ कार आणि प्रवासी बसमध्ये ही टक्कर झाली. यात महाराष्ट्रातील ३ जणांसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.' मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांनी ओळख पटली असून यात लेशिया आशिष परी, निक्की आशिष परी, हेतल आशिष परी या महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच ड्रायव्हर फहीम अहमद बदयारी जो सोईतांग श्रीनगरचा रहिवासी आहे, याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ जणांना हाडांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ८ जणांना एसकेआयएमएसमध्ये पाठवण्यात आले आहे. ५-६ जण सध्या निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २ जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकानी बचाव कार्य केलं. या घटनेबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त करत एका निवेदनात म्हटले आहे की, कंगनजवळील महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातामुळे खूप दुःख झाले आहे, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. सध्या अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ