Accident News : काश्मीरमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह चौघांचा मृत्यू

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील कंगन येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ रविवारी (दि.२३) बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह एका स्थानिक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २ पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती देताना कंगनचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. अर्शिद बाबा यांनी सांगितले की, 'ही एक दुर्दैवी घटना आहे.



केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ कार आणि प्रवासी बसमध्ये ही टक्कर झाली. यात महाराष्ट्रातील ३ जणांसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.' मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांनी ओळख पटली असून यात लेशिया आशिष परी, निक्की आशिष परी, हेतल आशिष परी या महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच ड्रायव्हर फहीम अहमद बदयारी जो सोईतांग श्रीनगरचा रहिवासी आहे, याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ जणांना हाडांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ८ जणांना एसकेआयएमएसमध्ये पाठवण्यात आले आहे. ५-६ जण सध्या निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २ जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकानी बचाव कार्य केलं. या घटनेबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त करत एका निवेदनात म्हटले आहे की, कंगनजवळील महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातामुळे खूप दुःख झाले आहे, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. सध्या अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.

Comments
Add Comment

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात

भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि