देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Accident News : काश्मीरमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह चौघांचा मृत्यू

  140

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील कंगन येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ रविवारी (दि.२३) बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह एका स्थानिक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २ पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती देताना कंगनचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. अर्शिद बाबा यांनी सांगितले की, 'ही एक दुर्दैवी घटना आहे.



केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ कार आणि प्रवासी बसमध्ये ही टक्कर झाली. यात महाराष्ट्रातील ३ जणांसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.' मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांनी ओळख पटली असून यात लेशिया आशिष परी, निक्की आशिष परी, हेतल आशिष परी या महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच ड्रायव्हर फहीम अहमद बदयारी जो सोईतांग श्रीनगरचा रहिवासी आहे, याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ जणांना हाडांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ८ जणांना एसकेआयएमएसमध्ये पाठवण्यात आले आहे. ५-६ जण सध्या निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २ जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकानी बचाव कार्य केलं. या घटनेबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त करत एका निवेदनात म्हटले आहे की, कंगनजवळील महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातामुळे खूप दुःख झाले आहे, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. सध्या अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.

Comments
Add Comment

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब

देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात