Aamir Khan : आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या मुलांची भेट

पुणे : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड तसेच त्याचे सहकारी तुरुंगात आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. न्यायालयात खटला सुरू आहे. संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ न्यायासाठी पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमिरने देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमिर खान संतोष देशमुख यांच्या मुलांना भेटला.



पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे रविवार २३ मार्च रोजी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम झाला. पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होते. यावेळी अमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. देशमुख कुटुंबाची विचारपूस केली. आमिर खानशी बोलत असताना धनंजय देशमुखांचे डोळे पाणावले होते. आमिर खान यांनी खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला. तसेच, विराज देशमुखला जवळ घेत कडकडून मिठी मारली. यावेळी आमिर खानच्या डोळ्यातही पाणी होते.
Comments
Add Comment

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा