५०० कुटुंबांच्या डोक्यावर अतिधोकादायक छप्पर; म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील ८० ते १०० वर्षे जुन्या उपकरप्राप्त (सेस) इमारतीत राहणाऱ्या तब्बल एक हजार ५०० कुटुंबांच्या डोक्यावर अतिधोकादायक छप्पर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या सेस इमारती कोसळून अपघात होऊ नये, यासाठी म्हाडाकडून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. त्यानुसार गेल्या दीड-दोन महिन्यांत केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती अतिधोकादायक वर्गवारीत येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित इमारतींमध्ये स्थलांतरित करण्याचे म्हाडासमोर आव्हान आहे.


म्हाडा MHADA मुंबईत सध्या १२ हजारांहून अधिक उपकरप्राप्त जुन्या इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती च पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. मात्र अनेक इमारती पुरत्या जीर्ण झाल्या असून, त्या दुरुस्तीपलीकडे गेल्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळून अपघात घडू नये, यासाठी म्हाडाने प्रथमदर्शनी धोकादायक दिसणाऱ्या ५२५ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट फेब्रुवारीमध्ये सुरू केले होते. त्यापैकी ३५० इमारतींचे अहवाल आले असून, त्यामध्ये ५० इमारती सी-१ म्हणजे अतिधोकादायक गटात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


या इमारती दोन-तीन मजली असून, त्यामध्ये प्रत्येकी २५ ते ३० कुटुंबे अशी एकूण सुमारे १ हजार ५०० कुटुंबे वास्तव्याला आहेत. दरम्यान, याबाबत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात, यासाठी म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना ७७ ब अंतर्गत इशारा नोटीस दिल्या जाणार आहेत. तसेच त्यांना संक्रमण शिबीर देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी