सुशांत प्रकरणी CBI च्या क्लोझर रिपोर्टवर काय म्हणाले बिहारचे माजी डीजीपी ?

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय ही गुन्ह्यांचा तपास करणारी एक व्यावसायिक संस्था आहे. जर पुरावे सापडले नाही तर सीबीआय आणखी काय करू शकते ? असे गुप्तेश्वर पांडे म्हणाले.





"सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा २० दिवसांनंतर त्याच्या वडिलांनी पाटणा येथे गुन्हा दाखल केला ज्याच्या चौकशीसाठी एक बिहारमधून एक पथक पाठवण्यात आले. पण महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही. मी चांगल्या समन्वयासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याला पाठवले. पण त्याला क्वारंटाईन केले... मला कोणाविरुद्धही पक्षपाती राहण्याची गरज नाही पण त्या काळात मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या वर्तनामुळे देशातील लोकांच्या मनात संशय निर्माण झाला... सीबीआयने प्रकरणाचा ताबा घेतला आणि तपास काही वर्षेदहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे, बिहार पोलिसांच्या पथकाला चौकशी करण्याची संधीही मिळाली नाही. सीबीआयला सर्व पुरावे मिळाले नाहीत किंवा कदाचित काही पुरावे नष्ट झाले असतील. पण मी कधीच असे म्हटले नाही की सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे... मी फक्त एवढेच म्हटले आहे की हा एक संशयास्पद मृत्यू आहे आणि त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे. जर मुंबई पोलिसांनी हे प्रकरण चांगले हाताळले असते... पत्रकार परिषद घेतली असती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असती तर मुंबई पोलिसांची बदनामी झाली नसती... सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर मी काहीही बोलू इच्छित नाही कारण ती एक व्यावसायिक एजन्सी आहे. जर तिला पुरावे सापडले नाहीत तर ती आणखी काय करू शकते ?" असे बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
Comments
Add Comment

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही