सुशांत प्रकरणी CBI च्या क्लोझर रिपोर्टवर काय म्हणाले बिहारचे माजी डीजीपी ?

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय ही गुन्ह्यांचा तपास करणारी एक व्यावसायिक संस्था आहे. जर पुरावे सापडले नाही तर सीबीआय आणखी काय करू शकते ? असे गुप्तेश्वर पांडे म्हणाले.





"सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा २० दिवसांनंतर त्याच्या वडिलांनी पाटणा येथे गुन्हा दाखल केला ज्याच्या चौकशीसाठी एक बिहारमधून एक पथक पाठवण्यात आले. पण महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही. मी चांगल्या समन्वयासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याला पाठवले. पण त्याला क्वारंटाईन केले... मला कोणाविरुद्धही पक्षपाती राहण्याची गरज नाही पण त्या काळात मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या वर्तनामुळे देशातील लोकांच्या मनात संशय निर्माण झाला... सीबीआयने प्रकरणाचा ताबा घेतला आणि तपास काही वर्षेदहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे, बिहार पोलिसांच्या पथकाला चौकशी करण्याची संधीही मिळाली नाही. सीबीआयला सर्व पुरावे मिळाले नाहीत किंवा कदाचित काही पुरावे नष्ट झाले असतील. पण मी कधीच असे म्हटले नाही की सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे... मी फक्त एवढेच म्हटले आहे की हा एक संशयास्पद मृत्यू आहे आणि त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे. जर मुंबई पोलिसांनी हे प्रकरण चांगले हाताळले असते... पत्रकार परिषद घेतली असती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असती तर मुंबई पोलिसांची बदनामी झाली नसती... सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर मी काहीही बोलू इच्छित नाही कारण ती एक व्यावसायिक एजन्सी आहे. जर तिला पुरावे सापडले नाहीत तर ती आणखी काय करू शकते ?" असे बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
Comments
Add Comment

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर