सुशांत प्रकरणी CBI च्या क्लोझर रिपोर्टवर काय म्हणाले बिहारचे माजी डीजीपी ?

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय ही गुन्ह्यांचा तपास करणारी एक व्यावसायिक संस्था आहे. जर पुरावे सापडले नाही तर सीबीआय आणखी काय करू शकते ? असे गुप्तेश्वर पांडे म्हणाले.





"सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा २० दिवसांनंतर त्याच्या वडिलांनी पाटणा येथे गुन्हा दाखल केला ज्याच्या चौकशीसाठी एक बिहारमधून एक पथक पाठवण्यात आले. पण महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही. मी चांगल्या समन्वयासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याला पाठवले. पण त्याला क्वारंटाईन केले... मला कोणाविरुद्धही पक्षपाती राहण्याची गरज नाही पण त्या काळात मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या वर्तनामुळे देशातील लोकांच्या मनात संशय निर्माण झाला... सीबीआयने प्रकरणाचा ताबा घेतला आणि तपास काही वर्षेदहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे, बिहार पोलिसांच्या पथकाला चौकशी करण्याची संधीही मिळाली नाही. सीबीआयला सर्व पुरावे मिळाले नाहीत किंवा कदाचित काही पुरावे नष्ट झाले असतील. पण मी कधीच असे म्हटले नाही की सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे... मी फक्त एवढेच म्हटले आहे की हा एक संशयास्पद मृत्यू आहे आणि त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे. जर मुंबई पोलिसांनी हे प्रकरण चांगले हाताळले असते... पत्रकार परिषद घेतली असती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असती तर मुंबई पोलिसांची बदनामी झाली नसती... सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर मी काहीही बोलू इच्छित नाही कारण ती एक व्यावसायिक एजन्सी आहे. जर तिला पुरावे सापडले नाहीत तर ती आणखी काय करू शकते ?" असे बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी