नागपूरमधून संचारबंदी हटवली

नागपूर : नागपूर पोलिसांनी रविवार २३ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर आणि तहसीलसह सर्व संचारबंदी असलेल्या भागांमधून संचारबंदी हटवली आहे. याआधी १७ मार्च रोजी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने आणि शांतता प्रस्थापित झाल्याने संपूर्ण शहर संचारबंदी मुक्त झाले आहे.



संचारबंदीच्या काळात संबंधित भागांतील सर्व दुकानं, बाजारपेठा, शाळा आणि व्यावसायिक आस्थापनांना बंद ठेवले होते. सततच्या बंदमुळे सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी संचारबंदी हटवली आहे. यामुळे नारिकांना दिलासा मिळाला आहे.



याआधी संचारबंदीच्या काळात परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यावर गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील भागात नागरिकांना सकाळी ७ ते १० या वेळेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम होती. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. रविवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी संपूर्ण शहरातून संचारबंदी हटवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली असून, त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १२ अल्पवयीन आरोपींवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. दंगल करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच दंड रुपाने वसुली करुन सरकार हानीची भरपाई करणार आहे. ज्यांची दंड देण्याची ऐपत नाही अशा आरोपींची मालमत्ता विकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Add Comment

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली