नागपूरमधून संचारबंदी हटवली

नागपूर : नागपूर पोलिसांनी रविवार २३ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर आणि तहसीलसह सर्व संचारबंदी असलेल्या भागांमधून संचारबंदी हटवली आहे. याआधी १७ मार्च रोजी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने आणि शांतता प्रस्थापित झाल्याने संपूर्ण शहर संचारबंदी मुक्त झाले आहे.



संचारबंदीच्या काळात संबंधित भागांतील सर्व दुकानं, बाजारपेठा, शाळा आणि व्यावसायिक आस्थापनांना बंद ठेवले होते. सततच्या बंदमुळे सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी संचारबंदी हटवली आहे. यामुळे नारिकांना दिलासा मिळाला आहे.



याआधी संचारबंदीच्या काळात परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यावर गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील भागात नागरिकांना सकाळी ७ ते १० या वेळेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम होती. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. रविवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी संपूर्ण शहरातून संचारबंदी हटवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली असून, त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १२ अल्पवयीन आरोपींवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. दंगल करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच दंड रुपाने वसुली करुन सरकार हानीची भरपाई करणार आहे. ज्यांची दंड देण्याची ऐपत नाही अशा आरोपींची मालमत्ता विकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक