नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार

  47

नाशिक : महाराष्ट्रात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल. गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी पुढील महिन्यांपासून काम सुरू होईल. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाईल. उत्तर प्रदेश येथे महाकुंभसाठी कायदा तयार करण्यात आला, आपणही तसाच कायदा करणार आहोत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात ११ पूल तयार करण्याचा निर्णय झाला आहे. नवीन घाट बनवण्यात येतील. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्राधिकरणात साधू महंत नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये सरकारी अधिकारी त्यांची जबाबदारी पार पाडतील. तर कुंभमेळ्याची अध्यात्मिक बाजू ही साधूमहंत हाताळतील; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण हे प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या