नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार

नाशिक : महाराष्ट्रात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल. गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी पुढील महिन्यांपासून काम सुरू होईल. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाईल. उत्तर प्रदेश येथे महाकुंभसाठी कायदा तयार करण्यात आला, आपणही तसाच कायदा करणार आहोत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात ११ पूल तयार करण्याचा निर्णय झाला आहे. नवीन घाट बनवण्यात येतील. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्राधिकरणात साधू महंत नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये सरकारी अधिकारी त्यांची जबाबदारी पार पाडतील. तर कुंभमेळ्याची अध्यात्मिक बाजू ही साधूमहंत हाताळतील; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण हे प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत