नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार

नाशिक : महाराष्ट्रात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल. गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी पुढील महिन्यांपासून काम सुरू होईल. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाईल. उत्तर प्रदेश येथे महाकुंभसाठी कायदा तयार करण्यात आला, आपणही तसाच कायदा करणार आहोत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात ११ पूल तयार करण्याचा निर्णय झाला आहे. नवीन घाट बनवण्यात येतील. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्राधिकरणात साधू महंत नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये सरकारी अधिकारी त्यांची जबाबदारी पार पाडतील. तर कुंभमेळ्याची अध्यात्मिक बाजू ही साधूमहंत हाताळतील; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण हे प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात