Aurangzeb tomb : औरंगजेब कबरीच्या वादामुळे पर्यटन ठप्प!

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब एक जुलमी बादशहा होता. त्याची कबर महाराष्ट्रात नको, अशी राजकीय मागणी होऊ लागली आहे. ही मागणी सुरू झाल्यापासून औरंगजेबाच्या खुलताबादमधील कबरी भोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या घडामोडींचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजिंठा आणि वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला तसेच मुघलकालीन वास्तू बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, असे स्थानिक सांगत आहेत. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षांमुळेही पर्यटनात घट झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.



जगप्रसिद्ध वेरुळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर, खुलताबाद भद्रा मारूती तसेच सुफी संताचा दर्गा खुलताबाद परिसरात असल्याने या भागात कायम पर्यटकांचा राबता असतो. मात्र, मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे. यामुळे परिसरातील हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पर्यटकांनी आगाऊ केलेली नोंदणी रद्द करत येथे येण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. विविध भागातील पर्यटक सध्या वातावरण कसे आहे ? अशी विचारणा करूनच पर्यटनाची आखणी करत आहेत. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद परिसरात जवळपास १०० चांगल्या दर्जाच्या रिसोर्ट, हॉटेल, लॉजिंग आहेत. मात्र, औरंगजेब कबर प्रकरणामुळे गेल्या १५ दिवसापासून आगाऊ नोंदणी धडाधड रद्द होत असल्याने व्यावसायिक व्यथित झाले आहेत. शिर्डी, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर असे पर्यटनाचे मोठे सर्कीट असल्याने या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेलची ऑनलाईन बुकींग महिना पंधरा दिवस अगोदर होते. मात्र, मागील काही दिवसांपासून केवळ औरंगजेब कबर प्रकरणामुळे जो वाद व गदारोळ सुरू असल्याने बुकींग रद्द होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

Comments
Add Comment

Dharashiv : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच गोंधळ, महिलेनं अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

Dharashiv : धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40

Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 45 हजार नावं शिधापत्रिकेच्या यादीतून हटवली, तुमचंही नाव यादीत तर नाही ना ?

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून