आयपीएल २०२५ साठी चार नियमांत बदल, स्पर्धेचे स्वरुपच बदलले

  70

कोलकाता : आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयने नियमांत बदल केला आहे. नवे नियम आयपीएलमध्ये शनिवार २२ मार्चपासून लागू झाले आहेत. बीसीआयच्या निर्णयानुसार चार असे नियम यंदाच्या आयपीएलमध्ये लागू झाले आहेत ज्यांनी स्पर्धेचे स्वरुप बदलले आहे.



नियम १ : लाळेवरील बंदी मागे घेतली

आयपीएल २०२५ मध्ये खेळाडू चेंडूला लाळ लावून लकाकी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. याआधी कोविड काळात म्हणजेच २०२० पासून आयपीएलमध्ये चेंडूला लाळ लावण्यावर बंदी लागू करण्यात आली होती. ही बंदी मागे घेण्यात आली आहे. यामुळे स्पर्धेत खेळाडू लकाकीसाठी चेंडूला लाळ लावू शकतात.



नियम २ : दुसरा नवा चेंडू

आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्या डावात ११ षटकांनंतर दुसरा नवीन चेंडू आणला येईल. दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी हा प्रयोग केला जाईल. संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार असलेल्या सर्व सामन्यांच्या दुसऱ्या डावात ११ षटकांनंतर दुसरा नवीन चेंडू आणता येईल. पण हा निर्णय पंचांनी परवानगी दिली तरच अमलात येईल. यामुळे संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार असलेल्या सर्व सामन्यांत एकूण तीन चेंडू वापरता येतील. पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात जास्तीत जास्त दोन अशा प्रकारे तीन चेंडू वापरता येतील. पण दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार असलेल्या सामन्यांना फक्त दोन चेंडू वापरले जातील. प्रत्येक डावासाठी एकच नवा चेंडू वापरला जाईल. यामुळे दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार असलेल्या सामन्यांमध्ये फक्त दोन चेंडूंचाच वापर होणार आहे.

नियम ३ : स्लो ओव्हर रेटसाठी सामना बंदी नाही

आयपीएल २०२५ मध्ये संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधारांवर बंदी घातली जाणार नाही. त्याऐवजी कर्णधारांवर डिमेरिट पॉइंट्स आणि दंड अशा स्वरुपात कारवाई केली जाईल.

स्तर १ - २५ ते ७५ टक्के सामना शुल्क दंड अधिक डिमेरिट पॉइंट्स (तीन वर्षांसाठी वैध)

स्तर २ - चार डिमेरिट पॉइंट्स

नियम ४ : वाईडसाठी डीआरएसचा विस्तार

आयपीएल २०२५ मध्ये उंचीच्या रुंदीचे पुनरावलोकन करुन वाईडचे निर्णय देण्यासाठी डीआरएसचा वापर करता येईल. तसेच ऑफ-स्टंपच्या बाहेरचे वाईडचे निर्णय देण्यासाठी डीआरएसचा वापर करता येईल.

 
Comments
Add Comment

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला