Navi Mumbai Fire : शिरवणे एमआयडीसीतील कंपनीला लागलेली आग नऊ तासांनी आटोक्यात!

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले.  या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी १० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून तब्बल ९ तासानंतर आग विझवण्यात यश आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे एमआईडीसीमधील शुभदा कंपनीमध्ये रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्नीशम दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात आली आहे. या संदर्भात अग्निशमन विभागाचे अधिकारी एस.एल. पाटील म्हणाले की, घटनास्थळी १२ अग्निशमन गाड्या उपस्थित आहेत. आम्ही लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान आणि आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.


दरम्यान, याआगीत कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेवेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र