Navi Mumbai Fire : शिरवणे एमआयडीसीतील कंपनीला लागलेली आग नऊ तासांनी आटोक्यात!

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले.  या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी १० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून तब्बल ९ तासानंतर आग विझवण्यात यश आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे एमआईडीसीमधील शुभदा कंपनीमध्ये रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्नीशम दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात आली आहे. या संदर्भात अग्निशमन विभागाचे अधिकारी एस.एल. पाटील म्हणाले की, घटनास्थळी १२ अग्निशमन गाड्या उपस्थित आहेत. आम्ही लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान आणि आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.


दरम्यान, याआगीत कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेवेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन