महापालिका शाळांमध्ये मॉनिटरिंग डिव्हाईस बसवणार

शाळांमधील विजेच्या वापरात ४० ते ५० टक्के होणार बचत


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आता आपल्या शाळांमध्ये वीज बचतीसाठी पुढाकार घेतला असून महापालिकेच्या एकूण ४६९ शालेय इमारतींमधील वीज बचत करणारे पंखे, ट्यूबलाईट आणि त्यासाठी एनर्जी मॉनिटरिंग डिव्हाईस लावण्यात येणार आहे. यामुळे महापालिका शाळांमधील तब्बल ४० ते ५० टक्के वीज बचत होणार असल्याचा दावा महापालिका शिक्षण विभागाने केला आहे.


मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ४६९ शाळा इमारतींमध्ये ८ माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा ठरोच अन्य मंडळाच्या शाळा चालविल्या जात आहेत. या सर्व शाळांमध्ये सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय इमारतींना पुरेसे पाणी तसेच पुरेसा विद्युत पुरवठाही केला जातो. वर्गामध्ये हवा खेळती रहावी यासाठी प्रत्येक वर्ग खोलीत किमान ४ ते ५ पंखे लावलेले असतात. तसेच पुरेसा प्रकाश असावा म्हणून किमान ५ ट्यूबलाईट लावलेल्या असतात. तसेच शाळा इमारतींच्या मजल्यावर, प्रत्येक गॅलरीत, पाण्याची खोली, टॉयलेट व वाथरुम आणि सभागृह या ठिकाणीही काही पंखे व ट्युबलाईट्स लावलेल्या असतात. इमारतीच्या तळाच्या पाण्याच्या टाकीतून इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत विद्युत पंपने पाणी चढविण्यात येते. या सर्व बाबींसाठी विजेचा वापर होत असतो आणि शाळा इमारतीचा वीज वापर आणि वीज बील भरणा यामध्ये पारदर्शकता येणे आणि वीज बिलात घट निर्माण करण्यासाठी महापालिकेने वीज बचतीचा मार्ग स्वीकारला आहे.


महानगरपालिका शाळा इमारतींमध्ये वीजबीलात ४० ते ५० टक्के बचत होण्यासाठी महात्मा फुले रिनिवेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट. क्बर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी महापालिकेला प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये एनर्जी इफिशिएंट्स बीएलडीएस फॅन्स, ट्युब लाईट आणि एनर्जी मॉनिटरींग डिवॉईस लावले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात गच्चीवर सोलर पॅनल बसवले जाणार आहे, ज्यामुळे वीज बिलात बचत होईल, त्यानुसार या कंपनीला सर्व महापालिका शाळांमधील पंखे, ट्युब लाईटसह एनर्जी मॉनिटरींग डिवॉईस बसवण्याचे काम दिले असून यासाठी विविध करांसह २८ कोटी ५३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.


शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या नियुक्त संस्थेला राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मान्यता आहे. तसेच मुंबई महापालिकेसोबत ११ मार्च २०२४ रोजी सामंजस्य करार झालेला आहे. यावर अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी स्वाक्षरी केली आहे. महाप्रिल ही महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील आहे. यामध्ये पंखे आणि ट्युब लाईट बदलले जातील आणि त्यांना डिवॉईस बसवले जाणार असल्याने वीज बिलात ४० ते ५० टक्के बचत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६

PM Kisan : राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब

ST bus : ४० वारकरी एकत्र आल्यास थेट गावातूनच सुटणार 'लालपरी'

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार ५०० विशेष बसेस; महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना मोफत सेवा मुंबई :

Piyush Goyal : सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी,

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या