जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर तीन तासांतच आईचे निधन

जळगाव: मातृत्वाच्या आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात झाल्याची हृदयस्पर्शी घटना पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात घडली. तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मातृत्वाचा आनंद मिळालेल्या ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (३७) यांचे प्रसूतीनंतर अवघ्या तीन तासांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जुळ्या बाळांचा जन्म कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरला असताना, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.


ज्योती चौधरी यांनी सावनेकर हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलगा आणि मुलीला जन्म दिला. या घटनेने संपूर्ण कुटुंब आनंदात होते, मात्र अवघ्या तीन तासांतच, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.


१६ वर्षांच्या वाट पाहणाऱ्या पती, आई-वडील आणि कुटुंबीयांचा आनंद एका क्षणात दुःखात परिवर्तित झाला. चौधरी कुटुंबीयांनी या बाळांसाठी आणि ज्योती चौधरी यांच्या मातृत्वासाठी अनेक नवस केले होते. परंतु नियतीने वेगळेच चित्र दाखवले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण बाहेरपुरा भागावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत