जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर तीन तासांतच आईचे निधन

जळगाव: मातृत्वाच्या आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात झाल्याची हृदयस्पर्शी घटना पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात घडली. तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मातृत्वाचा आनंद मिळालेल्या ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (३७) यांचे प्रसूतीनंतर अवघ्या तीन तासांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जुळ्या बाळांचा जन्म कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरला असताना, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.


ज्योती चौधरी यांनी सावनेकर हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलगा आणि मुलीला जन्म दिला. या घटनेने संपूर्ण कुटुंब आनंदात होते, मात्र अवघ्या तीन तासांतच, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.


१६ वर्षांच्या वाट पाहणाऱ्या पती, आई-वडील आणि कुटुंबीयांचा आनंद एका क्षणात दुःखात परिवर्तित झाला. चौधरी कुटुंबीयांनी या बाळांसाठी आणि ज्योती चौधरी यांच्या मातृत्वासाठी अनेक नवस केले होते. परंतु नियतीने वेगळेच चित्र दाखवले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण बाहेरपुरा भागावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

baba adhav passed away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा

राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार

नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह

'या' तारखेला १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर

विधानपरिषद आणि विधानसभेचे तालिका अध्यक्ष जाहीर; ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर

वन विभागाचा मोठा निर्णय; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका नातलगाला मिळेल सरकारी नोकरी

मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला