जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर तीन तासांतच आईचे निधन

  63

जळगाव: मातृत्वाच्या आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात झाल्याची हृदयस्पर्शी घटना पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात घडली. तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मातृत्वाचा आनंद मिळालेल्या ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (३७) यांचे प्रसूतीनंतर अवघ्या तीन तासांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जुळ्या बाळांचा जन्म कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरला असताना, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.


ज्योती चौधरी यांनी सावनेकर हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलगा आणि मुलीला जन्म दिला. या घटनेने संपूर्ण कुटुंब आनंदात होते, मात्र अवघ्या तीन तासांतच, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.


१६ वर्षांच्या वाट पाहणाऱ्या पती, आई-वडील आणि कुटुंबीयांचा आनंद एका क्षणात दुःखात परिवर्तित झाला. चौधरी कुटुंबीयांनी या बाळांसाठी आणि ज्योती चौधरी यांच्या मातृत्वासाठी अनेक नवस केले होते. परंतु नियतीने वेगळेच चित्र दाखवले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण बाहेरपुरा भागावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ