Disha Salian Case : ...म्हणून खासदार नारायण राणे म्हणाले, "आज बाळासाहेब ठाकरे असते तर..."

  71

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचे पडसाद उमटले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशाला न्याय मिळावा म्हणून विधानसभेत महायुतीचे नेते पुढे आले आहेत. अशातच काल(दि २० ) विधानसभेत चित्रा वाघ (chitra wagh) यांनी दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. त्यांच्या या कृतीचं खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक केलं आहे.



दिशा सालियनच्या ( Disha Salian ) मृत्यूनंतर ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेतही गदारोळ झाला. दिशाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली आहे. या चौकशीचा अहवाल कधी येणार ? हा अहवाल सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी विधानसभेत केली. यावर आता खासदार नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांची पाठ कौतुकाने थोपटली आहे.





ट्विट करत काय म्हणाले खासदार नारायण राणे ?


"छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांच्याही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरव केला असता. लगे रहो चित्राताई" म्हणत खासदार नारायण राणे यांनी चित्रा वाघ यांचं कौतुक केलं.





दरम्यान खासदार नारायण राणे यांच्या ट्विटला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. "धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है, जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है. मी सत्यासाठी... न्यायासाठी... अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्या सारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावत. " असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Comments
Add Comment

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या

भविष्यकाळात वीजदरात आणखी होणार घट

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात

मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, ५ जुलैला मुंबईत एकच अन् एकत्र मोर्चा निघणार; राऊतांची घोषणा

मुंबई : हिंदी भाषेच्या सक्तीविरीधात ठाकरे बंधू एकत्र येणार असं राज्यसभा खाजदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य