म्हाडा सोडतीत विजेता ठरवूनही ६५० जण घराच्या प्रतीक्षेत

  34

मुंबई : म्हाडाच्या सोडतीमधील ६५० विजेते ठरलेले गेल्या पाच महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. इमारतीला ओसी न मिळाल्यामुळे या घरांचा ताबा रखडला असून विजेते आता घरासाठी म्हाडाकडे विचारणा करू लागले आहेत. म्हाडाने गोरेगाव, मालाड, कुर्ला, पवई, विक्रोळी, अंधेरी येथील २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. या सोडतीत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या १३२७ घरांचादेखील समावेश होता. लॉटरी होऊन पाच महिने उलटून गेले तरी आपल्याला घर कधी मिळणार याकडे ६५० विजेते डोळे लावून बसले आहेत. यात पहाडी गोरेगाव, मालाड पूर्व येथील शिवधाम कॉम्प्लेक्स तसेच खडकपाडा येथील शिवनेरी को.ऑप-हौ. सोसायटी येथील विजेत्यांचा समावेश आहे. याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, निर्माणाधीन इमारतींमधील अंतर्गत कामे काही प्रमाणात शिल्लक आहेत. घरांना ओसी मिळताच विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. लवकरच ओसी मिळणे अपेक्षित आहे.
Comments
Add Comment

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने अखेर सोडल मौन

मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.आता

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट,

सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

भाऊचा धक्का येथे नवीन गस्ती नौकेची मंत्री राणे यांनी केली पहाणी मुंबई : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून

महिलांच्या नावे बनावट आयडी बनवणारा शुभम सिंग, पोलिसांच्या जाळ्यात; २५ वर्षीय सुरक्षा रक्षकाकडून ३०० महिलांची फसवणूक

मुंबई : महिला आणि मुलींच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून अश्लील मेसेज पसरवणाऱ्या शुभम कुमार

स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि रेडिओ क्लबदरम्यान प्रस्ताविक जेट्टीसाठी समुद्रलगत असणारी सरंक्षण भिंत ३०

धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात