म्हाडा सोडतीत विजेता ठरवूनही ६५० जण घराच्या प्रतीक्षेत

मुंबई : म्हाडाच्या सोडतीमधील ६५० विजेते ठरलेले गेल्या पाच महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. इमारतीला ओसी न मिळाल्यामुळे या घरांचा ताबा रखडला असून विजेते आता घरासाठी म्हाडाकडे विचारणा करू लागले आहेत. म्हाडाने गोरेगाव, मालाड, कुर्ला, पवई, विक्रोळी, अंधेरी येथील २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. या सोडतीत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या १३२७ घरांचादेखील समावेश होता. लॉटरी होऊन पाच महिने उलटून गेले तरी आपल्याला घर कधी मिळणार याकडे ६५० विजेते डोळे लावून बसले आहेत. यात पहाडी गोरेगाव, मालाड पूर्व येथील शिवधाम कॉम्प्लेक्स तसेच खडकपाडा येथील शिवनेरी को.ऑप-हौ. सोसायटी येथील विजेत्यांचा समावेश आहे. याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, निर्माणाधीन इमारतींमधील अंतर्गत कामे काही प्रमाणात शिल्लक आहेत. घरांना ओसी मिळताच विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. लवकरच ओसी मिळणे अपेक्षित आहे.
Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी