नाशिकमधील म्हाडाच्या ५०२ घरांसाठी ९०४ अर्ज

मुंबई (प्रतिनिधी): म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने २० टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ४९३ परवडणाऱ्या घरांसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी ९०४ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये म्हाडा योजनेच्या घरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेत काठेगल्लीतील रामबाग या प्रकल्पासाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून २२ सदनिकांसाठी १५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली असून एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेची सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.



विकासकांकडून नाशिक मंडळाला २० टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र तरीही म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ ही घरे मिळविण्यासाठी सातत्याने नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच २० टक्क्यातील ४९३ घरे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये नाशिक मधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात आली.



सर्वसाधारण लॉटरीव्दारे २९१ घरे तर प्रथम येणारयास प्रथम प्राधान्यानुसार २०२ घरे उपलब्ध झाली या घरांची लॉटरी काढण्यात आली. यामध्ये अल्प उत्पन्न गट, तसेच विविध प्रवर्गांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेत मखमलाबाद रोड परिसरातील गृहप्रकल्पांमध्ये १२ ते १८ लाखांपर्यंत वन आणि टू बीएचके घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत तर सातपूर शिवार, पाथर्डी, शिवार, विहीतगाव शिवार यासह गृहप्रकल्पांमध्ये १३ लाखांपासून घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्रयांच्या हस्ते एप्रिल महिन्यात या घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. स्विकृत अर्जाची अंतिम यादी ९ एप्रिल रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. सर्वसाधारण लॉटरीव्दारे उपलब्ध २९१ घरांसाठी ७२७ अर्ज प्राप्त झाले तर प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्यानूसार २०२ घरांसाठी १२० अर्ज प्राप्त झाले. सातपुर येथील म्हाडाच्या ७ घरांसाठी ५१ अर्ज तर येथील आरक्षित प्रवर्गातून २ घरांसाठी ६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद