...म्हणून युजवेंद्र चहल आणि धनश्रीने घेतला घटस्फोट

मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर मुंबईतील न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोट्यवधी रुपयांची पोटगी देऊन युजवेंद्र चहल आता धनश्री वर्मापासून वेगळा झाला आहे.



घटस्फोटाचा अर्ज केल्यावर सहा महिने विभक्त राहावे लागते. पण क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय देऊन घटस्फोटाचे हे प्रकरण संपल्याचे न्यायालयाने जाहीर केले. आयपीएल सुरू होण्याआधीच घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे युजवेंद्र आता खेळण्यावर लक्ष केंद्रीत करू शकेल.



क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. लग्नानंतर ते दोन वर्षे एकत्र राहीले. पण या दोन वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे न्यायालयात जेव्हा घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले तेव्हा, या दोघांनाही एकत्र राहण्यात समस्या असल्याचे सांगितले. एकत्र राहायचे नाही आणि त्यामध्येच दोघांचे भले असल्याचे वाटते, असे दोघांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. आता यापुढे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे पती-पत्नी नसतील.

युजवेंद्र चहल सध्या आरजे महावशला डेट करत असल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्यावेळी या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.
Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए