...म्हणून युजवेंद्र चहल आणि धनश्रीने घेतला घटस्फोट

  63

मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर मुंबईतील न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोट्यवधी रुपयांची पोटगी देऊन युजवेंद्र चहल आता धनश्री वर्मापासून वेगळा झाला आहे.



घटस्फोटाचा अर्ज केल्यावर सहा महिने विभक्त राहावे लागते. पण क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय देऊन घटस्फोटाचे हे प्रकरण संपल्याचे न्यायालयाने जाहीर केले. आयपीएल सुरू होण्याआधीच घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे युजवेंद्र आता खेळण्यावर लक्ष केंद्रीत करू शकेल.



क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. लग्नानंतर ते दोन वर्षे एकत्र राहीले. पण या दोन वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे न्यायालयात जेव्हा घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले तेव्हा, या दोघांनाही एकत्र राहण्यात समस्या असल्याचे सांगितले. एकत्र राहायचे नाही आणि त्यामध्येच दोघांचे भले असल्याचे वाटते, असे दोघांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. आता यापुढे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे पती-पत्नी नसतील.

युजवेंद्र चहल सध्या आरजे महावशला डेट करत असल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्यावेळी या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी