...म्हणून युजवेंद्र चहल आणि धनश्रीने घेतला घटस्फोट

मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर मुंबईतील न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोट्यवधी रुपयांची पोटगी देऊन युजवेंद्र चहल आता धनश्री वर्मापासून वेगळा झाला आहे.



घटस्फोटाचा अर्ज केल्यावर सहा महिने विभक्त राहावे लागते. पण क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय देऊन घटस्फोटाचे हे प्रकरण संपल्याचे न्यायालयाने जाहीर केले. आयपीएल सुरू होण्याआधीच घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे युजवेंद्र आता खेळण्यावर लक्ष केंद्रीत करू शकेल.



क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. लग्नानंतर ते दोन वर्षे एकत्र राहीले. पण या दोन वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे न्यायालयात जेव्हा घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले तेव्हा, या दोघांनाही एकत्र राहण्यात समस्या असल्याचे सांगितले. एकत्र राहायचे नाही आणि त्यामध्येच दोघांचे भले असल्याचे वाटते, असे दोघांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. आता यापुढे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे पती-पत्नी नसतील.

युजवेंद्र चहल सध्या आरजे महावशला डेट करत असल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्यावेळी या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.
Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख