तीन सामन्यासाठी बदलला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा या वर्षीचा हंगाम दोन दिवसांत सुरु होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या कर्णधाराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याच्या बोटाची दुखापत पूर्ण बरी होईपर्यंत, युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग संघाचे नेतृत्व करणार आहे. यादरम्यान सॅमसन विशेष फलंदाज म्हणून संघात सहभागी होणार असल्याची माहितीही राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

सॅमसनने संघाच्या अधिकृत एक्स हँडलवरून व्हिडिओद्वारे ही घोषणा केली आहे की, मी पुढील तीन सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. पुढील तीन सामन्यांसाठी रियान संघाचे नेतृत्व करणार आहे. तो हे करण्यास सक्षम आहे, आणि मला अपेक्षा आहे की सर्वजण त्याला पाठिंबा देतील.

राजस्थान रॉयल्सने जाहीर केले आहे की, आयपीएल २०२५ च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. हा युवा अष्टपैलू खेळाडू २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात, त्यानंतर २६ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि ३० मार्च रोजी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

२००४च्या हंगामात रियानची आकडेवारी

रियान परागने अलीकडील हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने ५२.०९ च्या सरासरीने आणि १४९.२१ च्या स्ट्राइक रेटने ५७३ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतके आणि सर्वोत्तम स्कोअर ८४* होता. त्याच्या नेतृत्वाखाली, राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या सुरुवातीसाठी चांगली तयारी केली आहे.
Comments
Add Comment

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार