तीन सामन्यासाठी बदलला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

  52

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा या वर्षीचा हंगाम दोन दिवसांत सुरु होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या कर्णधाराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याच्या बोटाची दुखापत पूर्ण बरी होईपर्यंत, युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग संघाचे नेतृत्व करणार आहे. यादरम्यान सॅमसन विशेष फलंदाज म्हणून संघात सहभागी होणार असल्याची माहितीही राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

सॅमसनने संघाच्या अधिकृत एक्स हँडलवरून व्हिडिओद्वारे ही घोषणा केली आहे की, मी पुढील तीन सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. पुढील तीन सामन्यांसाठी रियान संघाचे नेतृत्व करणार आहे. तो हे करण्यास सक्षम आहे, आणि मला अपेक्षा आहे की सर्वजण त्याला पाठिंबा देतील.

राजस्थान रॉयल्सने जाहीर केले आहे की, आयपीएल २०२५ च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. हा युवा अष्टपैलू खेळाडू २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात, त्यानंतर २६ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि ३० मार्च रोजी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

२००४च्या हंगामात रियानची आकडेवारी

रियान परागने अलीकडील हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने ५२.०९ च्या सरासरीने आणि १४९.२१ च्या स्ट्राइक रेटने ५७३ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतके आणि सर्वोत्तम स्कोअर ८४* होता. त्याच्या नेतृत्वाखाली, राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या सुरुवातीसाठी चांगली तयारी केली आहे.
Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला