राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह २५ सेलिब्रिटींवर बेकायदेशीर सट्टेबाजीप्रकरणी एफआयआर दाखल

तेलंगणा : बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराचे अॅप्स यांच्याशी संबंधित प्रकरणात राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह २५ सेलिब्रिटींवर तेलंगणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. उद्योजक फणिंद्र शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह २५ अभिनेत्यांचा समावेश आहे. बेटिंग अॅप्सचा प्रचार करण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की १६ मार्च रोजी काही युवकांशी चर्चा करताना लक्षात आले की सोशल मीडियावर प्रमोट केल्या जाणाऱ्या बेटिंग अॅप्सवर पैसे लावण्यास प्रोत्साहीत झाले होते. या अॅप्सना प्रमोट करण्यासाठी या सेलेब्रिटींकडून भरघोस पैसे घेतले जात असल्याचा आरोपही फणिंद्र शर्मा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
Comments
Add Comment

सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना