
दिशाचा मृत्यू कशा प्रकारे झाला याचे नाट्य रुपांतर करावं. तिच्या वजनाएवढी बाहुली करुन ती पोलीस पंचनाम्याआधारे व्हरांड्यात उभी करुन खाली पाडावी. या चाचणीतून मृत्यू कसा झाला हे सत्य बाहेर येईल, असा विश्वास वकील निलेश ओझा यांनी व्यक्त केला. दिशा तसेच याचिकेत नमूद सर्व व्यक्तींचे घटनेच्या दिवशीचे विशिष्ट वेळेतले मोबाईल टॉवर लोकेशन तपासावे; अशीही मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे. कोविडचे कारण पुढे करुन दिशाचे पोस्टमॉर्टेम मृत्यूला ५० तास होऊन गेल्यानंतर करण्यात आले. या उलट चार दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी पोस्टमॉर्टेम पाच तासांच्या आत झाले होते. हे असे करण्यामागचे कारण कळलेच पाहिजे; अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.

Nagpur Violence : नागपूर दंगल, फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर : नागपूर दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी ५० ...
एक तक्रार आहे. या प्रकरणात तपास करा. जो योग्य असेल त्याला त्रास होणार नाही. ज्याने अयोग्य असे काही केले असेल त्याला तपासाचा त्रास होईल; असे सांगून वकील निलेश ओझा यांनी दिशाच्या प्रकरणात सखोल तपासच सत्य उलगडेल असे सांगितले.