नागपूर दंगल प्रकरणी १२५० हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल

नागपूर : नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिस पोलिसांनी 6 गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरव्या रंगाची चादर टाकून जाळली. त्यामुळे समाज माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व सायंकाळी दंगल पेटली. भालदारपुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच शंभरावर वाहनांची तोडफोड करीत पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यात 35 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.


अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी 50 हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलीस ठाण्यांत एकूण 6 गुन्हे दाखल झाले आहेत. दंगलग्रस्त परिसरातील जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये दिसणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांनी गोळा केली. सीसीटीव्ही फुटेजमधील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेणे सुरु केले असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी