Rangpanchami Bavdhan Bagad Yatra : बावधनची बगाड यात्रा म्हणजे काय ? ती कशी साजरी केली जाते ,जाणून घ्या

  118

सातारा : महाराष्ट्रात मैलामैलावर भाषा बदलतात त्याचप्रमाणे सण समारंभ साजरे करण्याची पद्धतही बदलते. महाराष्ट्रात होळीच्या आधी आणि नंतरच्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जत्रा आणि यात्रांचे दिवस सुरू होतात. या दिवसांत गावागावात चाकरमान्यांची मांदियाळी पाहायला मिळते. शहरांकडे पाठ फिरवून प्रत्येकजण गावाच्या दिशेने रवाना होतो. अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या या दिवसांना निमित्त ठरतं ते म्हणजे गावच्या ग्रामदेतवांच्या यात्रा आणि पालख्यांचं. अशाच पद्धतीची एक आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय असणारी लोकप्रिय यात्रा म्हणजे साताऱ्याच्या बावधनची (Bavdhan) 'बगाड यात्रा'.(Bagad Yatra)



साताऱ्यात दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधन या गावात बगाड यात्रा भरवली जाते. जवळपास साडेतीनशे वर्षांपासून या यात्रेची परंपरा असून, ही ऐतिहासिक आणि तितकीच पारंपरिक यात्रा ब्रिटीश काळापासून सुरू आहे. दरवर्षी फाल्गुन कृष्णपंचमी अर्थात रंगपंचमीच्या दिवशी या यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेमध्ये बगाडाला अनन्यसाधारण महत्त्वं. 'अगंबाई अरेच्चा!' या चित्रपटानंतर या यात्रेला अधिक ओळख मिळाली. तसेच 'जाऊ बाई गावात' या झी मराठीच्या रिऍलिटी शो नंतर या गावाला लोकप्रियता मिळाली.



नेमकी बगाड यात्रा असते तरी काय ?


या यात्रेची सुरुवात मायपौर्णिमेच्या दिवशी होते. याच दिवशी या बगाडाला लागणारे बांबू तोडले जातात. ते जोडल्यानंतर बगासाठीची लाकडं तोडली जातात. पुढे होळीच्या दिवशी रात्री १२ वाजता देवाला कौल लावला जातो. साधारण ५० लोकांमध्ये हा कौल लागतो आणि एकाच्याच बाजूनं उजवा कौल पडतो. बगाड म्हणजे बैलांनी ओढला जाणारा एक मोठा गाडा. असा गाडा ज्याला दगडी चाकं असतात आणि तो अतिशय बळानं ओढला जातो. दगडी चाकं, त्यावर कणा आणि लांब खांबांवर शीड अशी बगाडाची रचना असते. बगाडाच्या शीडाला नवसाच्या बगाड्याला टांगण्यात येतं. ज्यांचा नवस पूर्ण होतो अशाच व्यक्तीला बगाड्याचा मान दिला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील या अतिशय मानाच्या यात्रेचा उत्साह तब्बल चार दिवस चालतो. यामध्ये पहिल्या दिवशी देवाचं लग्न, दुसऱ्या दिवशी तिखटाचं जेवण, तिसऱ्या दिवशी छबिना आणि शेवटच्या दिवशी बगाड यात्रा निघते. यावेळी गुलालाची मनसोक्त उधळण करत बगाडावर खोबरं उधळत ही यात्रा बगाडासहीत पुढे जाते. बगाड्याचा या यात्रेच्या दिवशी उपवास असून, रात्री ताक पिऊन हा उपवास सोडण्याची प्रथा असल्याचं म्हटलं जातं. या यात्रेला संपूर्ण पंचक्रोशीतून लोक हा उत्सव पाहायला येतात.

Comments
Add Comment

मुलांची मज्जा! ८ आणि ९ जुलैला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी! पण कारण काय?

मुंबई : राज्यातील सर्वच शाळांना येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या

राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई: गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई: तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तुल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या

पुणे लैंगिक छळ: मोठा खुलासा , तक्रार खोटी!

पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीचा लैंगिक छळ केल्याची

पनवेल महानगरपालिका हद्दीतील एक ते अकरा गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासास सिडको सकारात्मक

मुंबई : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर एक ते अकरा क्रमांकाच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत

'थोरल्या बाजीरावांनी २० वर्षात ४१ लढाया जिंकल्या'

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांनी २० वर्षांत ४१ लढाया लढल्या आणि जिंकल्या. अपराजित राहिलेल्या थोरल्या बाजीराव