Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत मुदतवाढ दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती, ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रियेत ओटीपी (OTP) प्राप्त होणे अशक्य होणे किंवा इतर तांत्रिक समस्या उपस्थित केल्या होत्या.


या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्देशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, त्यांना या विस्तारित कालावधीत काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत त्यांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की, या विस्तारित कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.



ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?



  • लाभार्थींनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

  • पोर्टलवर लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि Captcha Code योग्य ठिकाणी टाका.

  • आधार प्रमाणिकरणासाठी परवानगी देऊन 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा.

  • आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा.

  • यानंतर, पती/वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP प्रक्रिया पूर्ण करा.

  • लाभार्थी भगिनीचा जात प्रवर्ग निवडा.

  • आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करून संपूर्ण माहितीची एकदा पडताळणी करावी आणि 'Submit' बटण क्लिक करावे.

  • 'e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली' असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी.



ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे



  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि फोटो.

  • रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती.

  • डोमासाईल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.

  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास, पतीचे वरीलपैकी कोणतेही (१५ वर्षांपूर्वीचे) अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागेल.

  • वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.

  • बँक खाते तपशील (Bank Account Details) आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,