Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा बृहन्मुंबई उपनगरातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाबाबत आहे. पुनर्विकासाचे धोरण निश्चित: मंत्रिमंडळाने वीस एकर (२० एकर) किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या (MHADA) गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणामुळे मुंबईतील अनेक जुन्या आणि मोठ्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मुंबई उपनगरातील नागरिकांना आधुनिक आणि सुरक्षित घरे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, ज्यामुळे मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे मानले जात आहे.



आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय


१. नगर विकास आणि आयकॉनिक शहरांचे धोरण


नगर विकास विभागाने राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांकडील जमिनी आणि भूखंडांचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य दिले आहे. या बैठकीत संकल्पना-आधारित (Concept-Based) आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले. यानुसार, सिडकोसह अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याचे अधिकार मिळणार आहेत. या धोरणातून निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची (International Business Hubs) उभारणी होणार असून, प्राधिकरणांकडील लॅँड बँकेचा प्रभावी वापर करणे हा यामागचा उद्देश आहे.



२. गृहनिर्माण आणि परवडणारी घरे


गृहनिर्माण विभागाने मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर (२० एकर) किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या (MHADA) गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणामुळे मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



३. मदत व पुनर्वसन विभागाला बळ


मदत व पुनर्वसन विभागाने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३' मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास मदत होणार आहे.



४. कौशल्य विकास आणि नोकरीची संधी


राज्यातील युवकांसाठी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता एकूण ३३९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांची २३२ आणि शिक्षकेतर १०७ पदांचा समावेश आहे, ज्यामुळे या विद्यापीठाला अधिक बळकटी मिळणार आहे.



५. महिला व बाल विकास विभागाकडून सामाजिक सुधारणा


महिला व बाल विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुधारणा केली आहे. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील काही मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार, 'महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९' यातील कलम ९ व कलम २६ मधील 'महारोगाने पिडीत', 'कुष्टरोगी', 'कुष्ठालये' असे शब्द वगळले जाणार आहेत.



६. विधि व न्याय विभागातील सुधारणा


याशिवाय, विधि व न्याय विभागाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे.

Comments
Add Comment

Pune news : पुणेकरांच्या खिशाला झळ! रिक्षा भाडेवाढीसह ई-रिक्षा आणि शेअर रिक्षेबाबत मोठे निर्णय

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची तडकाफडकी बदली

- अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

Gadchiroli : गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रम शाळेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा