NASA Astronauts Sunita Williams : ...म्हणून मोदी म्हणाले पृथ्वीला तुमची आठवण आली

मुंबई : संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (NASA Astronauts) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्ब्ल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. या क्षणाचे भारतवासीयांनीच नाही तर पंतप्रधानांनीही कौतुक केले आहे.



नासाच्या अंतराळवीर (NASA Astronauts) सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले विल्यम्स व विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. याचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान मोदींनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांची सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुकाने पाठ थोपटली आहे. वेलकम बॅक crew ९ या पृथ्वीला तुमची आठवण येत होती. असे मोदी म्हणाले.





काय म्हणाले पंतप्रधान मोदी


#Crew9, तुमचं स्वागत आहे! पृथ्वीला तुमची आठवण येत होती. Crew9च्या टीमसाठी धैर्य, धाडस आणि अमर्याद मानवी आत्म्याची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि #Crew9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अज्ञातासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल. अवकाश संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. सुनीता विल्यम्सने तिच्या कारकिर्दीत याचे उत्तम उदाहरण जगाला दिले आहे. त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचा आम्हाला अविश्वसनीय अभिमान आहे. जेव्हा अचूकता उत्कटतेला आणि तंत्रज्ञान दृढतेला भेटते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोत महिला सुरक्षा रक्षकाची सतर्कता; प्रवाशाकडून गांज्याची ९ पाकिटे जप्त, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट