MHADA : लॉटरी विजेत्यांना गृहकर्जासाठी मिळणार तात्काळ एनओसी, म्हाडाने दिला दिलासा

मुंबई : गृहकर्जासाठी एनओसी मिळवताना म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना वारंवार मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती.मात्र,सोमवारपासून विजेत्यांना तत्काळ एनओसी मिळणार असून विजेत्यांची होणारी धावपळ थांबणार आहे.त्यादृष्टीने म्हाडाने संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केले आहेत. म्हाडाकडून थेट अर्जदाराच्या बँकेच्या ईमेलवर एनओसी पाठवली जाणार असल्याने पुढील कार्यवाही तत्काळ करणे शक्य होणार आहे. म्हाडाचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. म्हाडा लाॅटरीत घर लागले तर विजेत्याला सुरुवातीला २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी बॅंकेकडून कर्ज मिळावे यासाठी विजेत्यांना म्हाडाची एनओसी घ्यावी लागते. ही एनओसी मिळवण्यासाठी म्हाडाकडे रितसर अर्ज केल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी लागतो. विजेत्यांनी म्हाडाकडे एनओसीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती तत्काळ देता यावी म्हणून म्हाडाने आपल्या सिस्टममध्ये बदल केले आहेत. यामुळे आता लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments
Add Comment

अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे? राजकीय वर्तुळाच्या नजरा मुख्यमंत्र्यांकडे

२३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या

Ajit Pawar Funeral : गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून दादांना अखेरचा निरोप

गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना अखेरचा

रूपया जागतिक अस्थिरतेत आणखी निचांकी पातळीवर! ९२ रूपये प्रति डॉलरवर पोहोचला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: रूपयात मोठा आघात झाल्याचे आज स्पष्ट झाले. जागतिक अस्थिरतेचा फटका सुरूवातीच्या विनिमयात (Foreign Exchange)

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या

अडीच वर्षांच्या संसारावर काळाचा घाला; पिंकी माळी यांचं विमान दुर्घटनेत निधन

मुंबई : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही

महापालिकेत एमआयएमचे महत्व वाढले

सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता आली असली तरी, अवघे ८