आयपीएल २०२५ वेळापत्रक बदलणार; एका सामन्यावर संकट

कोलकाता (वृत्तसंस्था): आयपीएल २०२५ चा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना घरच्या मैदानावर खेळता येणार नाही अशी दाट शक्यता आहे. यामुळे ६ एप्रिलला कोलकाताच्या ईडन होणाऱ्या केकेआर-लखनौ सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. ६ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक बदलेल अशी शक्यता आहे. या बदलामागील प्रमुख कारण रामनवमीचा सण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या दिवशी रामनवमीचा सण असल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने बीसीसीआयला या सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या दिवशी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांबरोबर झाली विशेष बैठक

पश्चिम बंगालामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील राजकीय संघर्ष जगजाहीर आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त २० हजार मिरवणुका आयोजित केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. म्हणूनच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशीश गांगुली यांनी कोलकाता पोलिसांबरोबर मंगळवारी दोन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर पोलिसांनी अद्याप ६ तारखेच्या सामन्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. "आम्हाला या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांचं संरक्षण नसेल तर ६५ हजार प्रेक्षकांना हाताळणं कठीण होईल," असे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर