आयपीएल २०२५ वेळापत्रक बदलणार; एका सामन्यावर संकट

कोलकाता (वृत्तसंस्था): आयपीएल २०२५ चा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना घरच्या मैदानावर खेळता येणार नाही अशी दाट शक्यता आहे. यामुळे ६ एप्रिलला कोलकाताच्या ईडन होणाऱ्या केकेआर-लखनौ सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. ६ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक बदलेल अशी शक्यता आहे. या बदलामागील प्रमुख कारण रामनवमीचा सण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या दिवशी रामनवमीचा सण असल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने बीसीसीआयला या सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या दिवशी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांबरोबर झाली विशेष बैठक

पश्चिम बंगालामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील राजकीय संघर्ष जगजाहीर आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त २० हजार मिरवणुका आयोजित केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. म्हणूनच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशीश गांगुली यांनी कोलकाता पोलिसांबरोबर मंगळवारी दोन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर पोलिसांनी अद्याप ६ तारखेच्या सामन्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. "आम्हाला या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांचं संरक्षण नसेल तर ६५ हजार प्रेक्षकांना हाताळणं कठीण होईल," असे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय