Hinjewadi Accident Today : हिंजवडीच्या धावत्या बसला आग, चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण १५ जण होते.




 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना सर्कल वरून रिजवान च्या दिशेने जाणाऱ्या बस ने समोरून अचानक पेट घेतला. चालकाला देखील आगीच्या झळा पोहोचल्याने आणि त्याच्या पायाला आग लागल्याने त्याने उडी घेतली. धावत्या बसचा वेग कमी झाला. पुढे काही अंतरावर जाऊन ती सिमेंटच्या ब्लॉकला धडकली. तोपर्यंत बसमधील इतर व्यक्तींनी खिडक्यांमधून उड्या मारल्या परंतु, पाठीमागे असलेल्या चार जणांना बाहेर पडता आलं नाही. आपत्कालीन दरवाजा उघडला गेला नाही. यात चारही जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे