राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारकडून पुन्हा एकदा आयएएस ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात केल्या आहेत. त्यामध्ये, नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कालच नागपूरमध्ये २ गटांत तणाव निर्माण झाल्यामुळे नागपूर शहर राज्यात चर्चेत होते. दरम्यान, सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच, आता नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मीनल करनवाल यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किनवट येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक कवली मेघना यांची नांदे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


जव्हार येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक करिश्मा नायर यांना नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तीपदी नियुक्ती देण्यात आलीय. गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागातील सहायक जिल्हाधिकारी रणजित मोहन यादव यांना गडचिरोलीतील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या