राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  44

मुंबई : राज्य सरकारकडून पुन्हा एकदा आयएएस ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात केल्या आहेत. त्यामध्ये, नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कालच नागपूरमध्ये २ गटांत तणाव निर्माण झाल्यामुळे नागपूर शहर राज्यात चर्चेत होते. दरम्यान, सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच, आता नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मीनल करनवाल यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किनवट येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक कवली मेघना यांची नांदे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


जव्हार येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक करिश्मा नायर यांना नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तीपदी नियुक्ती देण्यात आलीय. गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागातील सहायक जिल्हाधिकारी रणजित मोहन यादव यांना गडचिरोलीतील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Lift Collapse: कल्याणमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्टचा अपघात, आठ जणांपैकी चारजण गंभीर जखमी, तर दोघांचे पाय...

कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील रॉयस बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट पडल्याने मोठी

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या

चालत्या ट्रॅव्हल बसमध्ये एकाने घेतले पेटवून! जागीच मृत्यू... अन्य प्रवाशांची धावपळ

जालना: महाराष्ट्रातील जालना येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप