राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारकडून पुन्हा एकदा आयएएस ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात केल्या आहेत. त्यामध्ये, नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कालच नागपूरमध्ये २ गटांत तणाव निर्माण झाल्यामुळे नागपूर शहर राज्यात चर्चेत होते. दरम्यान, सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच, आता नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मीनल करनवाल यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किनवट येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक कवली मेघना यांची नांदे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


जव्हार येथील आयटीडीपी प्रकल्प संचालक करिश्मा नायर यांना नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तीपदी नियुक्ती देण्यात आलीय. गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागातील सहायक जिल्हाधिकारी रणजित मोहन यादव यांना गडचिरोलीतील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

सतत थकवा जाणवतोय ? हे सोपे उपाय देतील तुम्हाला नवीन ऊर्जा !

मुंबई : आपली जीवनशैली जसजशी गतिमान होत आहे, तसतसे शरीर आणि मनावर ताण वाढत चालला आहे. दिवसभराची धावपळ, चुकीच्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

लहान मुलांसाठी सनस्क्रीन वापरावे का ? कशी घ्याल त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी!

मुंबई : लहान मुलांची काळजी घेणं असं प्रत्येक पालकांना वाटतं. ऋतूनुसार लहान मुलांच्या त्वचेसाठी काय गरजेचं आहे

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा