या कंपनीने लाँच केला खास प्लान, ७५० रूपयांत मिळणार ६ महिन्यांची सर्व्हिस

मुंबई: BSNLच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनीने नुकताच एक नवा प्लान सादर केला आहे. हा परवडणारा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी आणि दुसऱ्या सर्व्हिस मिळतात. आम्ही बोलत आहोत BSNLच्या ७५० रूपयांच्या नव्या प्लानबद्दल...


हा प्लान ६ महिन्यांची व्हॅलिडिटी म्हणजेच १८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात. ७५० रूपयांच्या बीएसएनएलच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यात तुम्हाला दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदे मिळतात.


सोबतच कंपनी तुम्हाला दररोज १०० एसएमएस देते. यात दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला असा प्लान मिळणार नाही. दरम्यान, BSNLचा हा प्लान सर्व युजर्ससाठी नाही. या प्लानचा फायदा केवळ GP-2 ग्राहकांना मिळणार आहे. आता सवाल असा आहे की हे ग्राहक कोण?


असे ग्राहक यांनी आपले कनेक्शन ७ दिवसांपेक्षा अधिक काळ रिचार्ज केलेले नाही त्यांना GP-2 ग्राहक म्हटले जाते. यासाठीची आणखी एक अट आहे ती म्हणजे ७ दिवसांपर्यंत रिचार्ज न केल्यानंतर १६५ दिवसांपर्यंत ते GP-2 ग्राहक बनतात. असे युजर्स ७५० रूपयांचा प्लान वापरू शकतात.


हा प्लान एक स्वस्त पर्याय आहे. यात तुम्हाला कमी किंमतीत दीर्घ व्हॅलिडिटीसोबत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध