या कंपनीने लाँच केला खास प्लान, ७५० रूपयांत मिळणार ६ महिन्यांची सर्व्हिस

मुंबई: BSNLच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनीने नुकताच एक नवा प्लान सादर केला आहे. हा परवडणारा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी आणि दुसऱ्या सर्व्हिस मिळतात. आम्ही बोलत आहोत BSNLच्या ७५० रूपयांच्या नव्या प्लानबद्दल...


हा प्लान ६ महिन्यांची व्हॅलिडिटी म्हणजेच १८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात. ७५० रूपयांच्या बीएसएनएलच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यात तुम्हाला दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदे मिळतात.


सोबतच कंपनी तुम्हाला दररोज १०० एसएमएस देते. यात दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला असा प्लान मिळणार नाही. दरम्यान, BSNLचा हा प्लान सर्व युजर्ससाठी नाही. या प्लानचा फायदा केवळ GP-2 ग्राहकांना मिळणार आहे. आता सवाल असा आहे की हे ग्राहक कोण?


असे ग्राहक यांनी आपले कनेक्शन ७ दिवसांपेक्षा अधिक काळ रिचार्ज केलेले नाही त्यांना GP-2 ग्राहक म्हटले जाते. यासाठीची आणखी एक अट आहे ती म्हणजे ७ दिवसांपर्यंत रिचार्ज न केल्यानंतर १६५ दिवसांपर्यंत ते GP-2 ग्राहक बनतात. असे युजर्स ७५० रूपयांचा प्लान वापरू शकतात.


हा प्लान एक स्वस्त पर्याय आहे. यात तुम्हाला कमी किंमतीत दीर्घ व्हॅलिडिटीसोबत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते